शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

'त्या' ५६ हजार जणांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली; पण सरकारकडे त्यांची यादीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 09:17 IST

रीतसर नोंदणीच्या मागणीला केराची टोपली

- प्रवीण खापरे नागपूर : कोरोनाकाळात आर्थिक स्थिती ढासळल्याने सांस्कृतिक संचालनालयाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ५६ हजार कलावंतांना आर्थिक मदत जाहीर केली. मात्र, जाहीर करण्यात आलेल्या या कलावंतांची यादी सरकारकडे नसल्याने ही मदत कशी पोहोचवली जाईल, हा प्रश्न आहे. लॉकडाऊनचा फटका बसलेल्या सांस्कृतिक क्षेत्राकडे फार उशिरानेच राज्य सरकारचे लक्ष गेले आणि राज्यातील ५६ हजार कलावंतांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली गेली. रंगकर्मींनी ऑगस्ट क्रांतिदिनी राज्यभरात उभारलेल्या नियोजित आंदोलनाचा धसका म्हणूनही याकडे बघता येईल. राज्यातील विविध सांस्कृतिक संघटना, कलावंतांकडून अनेक वर्षांपासून राज्यात विविध कलाप्रकारांत मोडणाऱ्या कलावंतांची नोंदणी करण्याची मागणी होत असताना, त्याकडे  दुर्लक्षच केले गेले. ती मागणी सरकारदरबारी धूळखात पडली आहे. विशेष म्हणजे, या आर्थिक योजनांचा लाभ वाहत्या गंगेत हात धुणाऱ्यांनाच अधिक होण्याची शक्यता आहे. यंत्रणा लागली कामाला कलावंतांना आर्थिक मदत जाहीर होण्याच्या निमित्ताने राज्यातील कलावंतांची यादी तयार होणार आहे आणि आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आलेल्या या मागणीची पूर्तता होणार असल्याची भावना सांस्कृतिक विभागातील एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केली. ५६ हजार कलावंतांचा आकडा हा मोघम आहे. हा आकडा कमी किंवा जास्तही असू शकतो. परंतु, यंत्रणा कामाला लागली हे महत्त्वाचे.जिल्ह्याकडेही नाही कलावंतांची यादीही आर्थिक मदत जिल्हास्तरावर पोहोचती होणार आहे. त्यामुळे त्या त्या जिल्ह्यातील कलावंतांची यादी जिल्हाधिकारी अगर सांस्कृतिक विभागाकडे असणे गरजेचे आहे. मात्र, राज्यातील एकाही जिल्ह्याकडे कलावंतांची रीतसर यादी नसल्याचेच स्पष्ट होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे