शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 10:53 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना विधानसभेत सुद्धा भाजपचीचं सत्ता येणार असल्याची अपेक्षा होती.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना विधानसभेत सुद्धा भाजपचीचं सत्ता येणार असल्याची अपेक्षा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा या घटक पक्षांनी युती सोबत राहण्याचे पसंद केले. मात्र निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना वेगळी झाली व महाविकास आघाडीची निर्मिती होऊन सत्तास्थापना सुद्धा होत आहे. त्यामुळे आता भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने घटक पक्षांच्या मदतीने महायुती करून निवडणूक लढवली होती. लोकसभेला मिळाले यश पाहता पुन्हा भाजपचीच राज्यात सत्ता येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत राहण्याची संधी असल्याची अपेक्षा घटक पक्षांना होती. मात्र, निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना पक्ष वेगवेगळे झाल्यामुळे बहुमत असून, सरकार स्थापन करू शकले नाहीत.

तर अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. त्यामुळे गेलेली संधी पुन्हा निर्माण झाली असल्याचे घटक पक्षांना वाटत होते. मात्र, फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी पायउतार झाले. फडणवीस यांनी राजीनामा दिला.

त्यांनतर शिवसनेने राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. अखेर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरवून ह्या तिन्ही पक्षांनी सत्तास्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला. त्यानुसार आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, राज्यात नव्यानेच महाविकास आघाडीची सत्ता स्थापना होणार आहे. मात्र यामुळे भाजपच्या घटकपक्षांच्या अपेक्षा भंग झाल्या आहे.भाजपचे घटकपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाइं रामदास आठवले गटाचे अविनाश महातेकर हे गेल्यावेळी मंत्री होते. पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले असते, तर या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली असती. मात्र, तसे काही घडले नाही. त्यामुळे भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले असल्याचे बोलले जात आहे.