शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

Maharashtra Government: भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 10:53 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना विधानसभेत सुद्धा भाजपचीचं सत्ता येणार असल्याची अपेक्षा होती.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना विधानसभेत सुद्धा भाजपचीचं सत्ता येणार असल्याची अपेक्षा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा या घटक पक्षांनी युती सोबत राहण्याचे पसंद केले. मात्र निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना वेगळी झाली व महाविकास आघाडीची निर्मिती होऊन सत्तास्थापना सुद्धा होत आहे. त्यामुळे आता भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने घटक पक्षांच्या मदतीने महायुती करून निवडणूक लढवली होती. लोकसभेला मिळाले यश पाहता पुन्हा भाजपचीच राज्यात सत्ता येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत राहण्याची संधी असल्याची अपेक्षा घटक पक्षांना होती. मात्र, निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना पक्ष वेगवेगळे झाल्यामुळे बहुमत असून, सरकार स्थापन करू शकले नाहीत.

तर अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. त्यामुळे गेलेली संधी पुन्हा निर्माण झाली असल्याचे घटक पक्षांना वाटत होते. मात्र, फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी पायउतार झाले. फडणवीस यांनी राजीनामा दिला.

त्यांनतर शिवसनेने राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. अखेर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरवून ह्या तिन्ही पक्षांनी सत्तास्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला. त्यानुसार आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, राज्यात नव्यानेच महाविकास आघाडीची सत्ता स्थापना होणार आहे. मात्र यामुळे भाजपच्या घटकपक्षांच्या अपेक्षा भंग झाल्या आहे.भाजपचे घटकपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाइं रामदास आठवले गटाचे अविनाश महातेकर हे गेल्यावेळी मंत्री होते. पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले असते, तर या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली असती. मात्र, तसे काही घडले नाही. त्यामुळे भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले असल्याचे बोलले जात आहे.