शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

Maharashtra Government: भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 10:53 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना विधानसभेत सुद्धा भाजपचीचं सत्ता येणार असल्याची अपेक्षा होती.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना विधानसभेत सुद्धा भाजपचीचं सत्ता येणार असल्याची अपेक्षा होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा या घटक पक्षांनी युती सोबत राहण्याचे पसंद केले. मात्र निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना वेगळी झाली व महाविकास आघाडीची निर्मिती होऊन सत्तास्थापना सुद्धा होत आहे. त्यामुळे आता भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी फेरले गेल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने घटक पक्षांच्या मदतीने महायुती करून निवडणूक लढवली होती. लोकसभेला मिळाले यश पाहता पुन्हा भाजपचीच राज्यात सत्ता येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे पुन्हा सत्तेत राहण्याची संधी असल्याची अपेक्षा घटक पक्षांना होती. मात्र, निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना पक्ष वेगवेगळे झाल्यामुळे बहुमत असून, सरकार स्थापन करू शकले नाहीत.

तर अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. त्यामुळे गेलेली संधी पुन्हा निर्माण झाली असल्याचे घटक पक्षांना वाटत होते. मात्र, फडणवीस आणि अजित पवारांचं सरकार विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी पायउतार झाले. फडणवीस यांनी राजीनामा दिला.

त्यांनतर शिवसनेने राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. अखेर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरवून ह्या तिन्ही पक्षांनी सत्तास्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला. त्यानुसार आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, राज्यात नव्यानेच महाविकास आघाडीची सत्ता स्थापना होणार आहे. मात्र यामुळे भाजपच्या घटकपक्षांच्या अपेक्षा भंग झाल्या आहे.भाजपचे घटकपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, रिपाइं रामदास आठवले गटाचे अविनाश महातेकर हे गेल्यावेळी मंत्री होते. पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले असते, तर या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली असती. मात्र, तसे काही घडले नाही. त्यामुळे भाजपच्या घटकपक्षातील नेत्यांच्या आशेवर पाणी फिरले असल्याचे बोलले जात आहे.