शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

महाराष्ट्राने प्रेम आणि विश्वास दिला; एकात्मतेचा प्रकाश उजळवीत राहुल गांधींनी घेतला राज्याचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 06:26 IST

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोेठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.

नीलेश जोशी/अनिल गवई   निमखेडी (जि. बुलढाणा) -  भारत जोडो पदयात्रेंतर्गत महाराष्ट्रातील जनतेने गेल्या १४ दिवसांत मला प्रेम आणि विश्वास दिला. महाराष्ट्राची शिकवण समरसतेची आहे. ज्यांनी द्वेष पसरविला, ते पण आपलेच आहेत. त्यांच्याविना आपला महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे भावोद्गार समारोपप्रसंगी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी येथे काढले. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोेठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.

प्रेम व विश्वासाचा संदेश घेत पाच राज्यातून सुमारे १,७०० किमीचा यात्रेचा निम्मा प्रवास महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या सीमेवर ‘एकात्मतेचा प्रकाश’ उजळला. तिरंगी फुगे आकाशात झेपावताच पदयात्रेचा  राज्यातील तील भावपूर्ण प्रवास पूर्ण झाला. सामाजिक सौदार्हाची बीजं महाराष्ट्राच्या हृदयात कायमची पेरली गेली.   

‘जय महाराष्ट्र’ म्हणत घेतला महाराष्ट्राचा निरोप  - निमखेडी येथील शेवटच्या कॉर्नर सभेत राहुल गांधी यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आभार मानले. - देशाच्या विकासासाठी मी सतत संघर्ष करीत राहील, असे आश्वस्त करीत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत  महाराष्ट्रातील जनतेचा निरोप घेतला.

तिरंगी प्रकाश पडताच वातावरण भावपूर्णउपस्थितांनी मेणबत्या प्रज्वलित करताच, अंधुक प्रकाशात राहुल गांधीनी कळ दाबली आणि सत्यमेव जयते स्तंभावर तिरंगी प्रकाश पडला. या प्रकाशात हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माची प्रतीके प्रकाशाने उजळली. त्यावेळी भावपूर्ण वातावरण झाले.

या नेत्यांची उपस्थितीलाइट ऑफ युनिटी कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, बाळासाहेब थाेरात, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे,  जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस