शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्राने प्रेम आणि विश्वास दिला; एकात्मतेचा प्रकाश उजळवीत राहुल गांधींनी घेतला राज्याचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 06:26 IST

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोेठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.

नीलेश जोशी/अनिल गवई   निमखेडी (जि. बुलढाणा) -  भारत जोडो पदयात्रेंतर्गत महाराष्ट्रातील जनतेने गेल्या १४ दिवसांत मला प्रेम आणि विश्वास दिला. महाराष्ट्राची शिकवण समरसतेची आहे. ज्यांनी द्वेष पसरविला, ते पण आपलेच आहेत. त्यांच्याविना आपला महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही, असे भावोद्गार समारोपप्रसंगी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी येथे काढले. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासह अनेकांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोेठे योगदान असल्याचेही ते म्हणाले.

प्रेम व विश्वासाचा संदेश घेत पाच राज्यातून सुमारे १,७०० किमीचा यात्रेचा निम्मा प्रवास महाराष्ट्रात मध्य प्रदेशच्या सीमेवर ‘एकात्मतेचा प्रकाश’ उजळला. तिरंगी फुगे आकाशात झेपावताच पदयात्रेचा  राज्यातील तील भावपूर्ण प्रवास पूर्ण झाला. सामाजिक सौदार्हाची बीजं महाराष्ट्राच्या हृदयात कायमची पेरली गेली.   

‘जय महाराष्ट्र’ म्हणत घेतला महाराष्ट्राचा निरोप  - निमखेडी येथील शेवटच्या कॉर्नर सभेत राहुल गांधी यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आभार मानले. - देशाच्या विकासासाठी मी सतत संघर्ष करीत राहील, असे आश्वस्त करीत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत  महाराष्ट्रातील जनतेचा निरोप घेतला.

तिरंगी प्रकाश पडताच वातावरण भावपूर्णउपस्थितांनी मेणबत्या प्रज्वलित करताच, अंधुक प्रकाशात राहुल गांधीनी कळ दाबली आणि सत्यमेव जयते स्तंभावर तिरंगी प्रकाश पडला. या प्रकाशात हिंदू, मुस्लीम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माची प्रतीके प्रकाशाने उजळली. त्यावेळी भावपूर्ण वातावरण झाले.

या नेत्यांची उपस्थितीलाइट ऑफ युनिटी कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, बाळासाहेब थाेरात, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे,  जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस