शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

Maharashtra flood : अलमट्टीतून आता 4,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 17:16 IST

Maharashtra Floods : 'राज्यात पूरपरिस्थिती असताना जनतेला दिलासा देणे सोडून चुकीच्या पद्धतीने माहिती देणे उचित ठरणार नाही'

मुंबई :  अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने आज दुपारपर्यंत 4,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. विरोधकांकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जाते आहे. राज्यात पूरपरिस्थिती असताना जनतेला दिलासा देणे सोडून चुकीच्या पद्धतीने माहिती देणे उचित ठरणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संपूर्ण माहिती समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष करून अशापद्धतीने चुकीची माहिती विरोधकांकडूनदिली जात आहे. कर्नाटक मुख्यमंत्री कार्यालयाने आज सकाळीच एक ट्विट करून 4,30,352 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग होत असल्याचे सांगिल्यानंतर सुद्धा कमी प्रमाणात विसर्ग असल्याचे भासविण्यात येत आहे. 3,80,316 क्युसेक इतकी आवक असताना त्यापेक्षा 50,000 क्यूसेकने अधिक विसर्ग करण्यात येत होता. आता हा विसर्ग दुपारपर्यंत 4,50,000 क्युसेकवर पोहोचला आहे, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे.

दुसरा विषय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या 7 ऑगस्टच्या जीआरसंदर्भातील आहे. त्यात एखादे क्षेत्र 2 दिवस पाण्यात असल्यास मदतीबाबतचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात मदतीचा निकष हा पूर्णत: आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालाच्या आधारावर ठरतो. पण, विरोधकांनी त्यावर लगेच तुघलकी वगैरे आरोप करणे सुरू केले आहे. टीका करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याच काळात 30 जानेवारी 2014 चा जीआर पाहिला असता, तर कशी टीका करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यांच्या काळात तर 7 दिवस एखादे क्षेत्र बुडित राहिल्याशिवाय मदत करायची नाही, असा नियम ठरविण्यात आला होता. (सोबत जीआर जोडत आहे.) हे राज्य सरकार संवेदनशील असून, पूर्णत: पूरग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे, असेही आशीष शेलार यांनी म्हटले आहे. आता पूरग्रस्तांना मदत वेळेत उपलब्ध होणे आवश्यक असून विरोधक त्याचे राजकारण करीत आहेत अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरAshish Shelarआशीष शेलार