शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

Maharashtra Flood: अस्मानी संकट थांबेना, आणखी १५ दिवस पावसाचे; शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 06:54 IST

उष्णतेतील वाढीला जमिनीतून मिळणारी आर्द्रता, त्यामुळे दुपारनंतर कम्युलस ढगांची निर्मिती होते.

पुणे/मुंबई : मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेले दोन-तीन दिवस ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. शनिवारी पहाटे औरंगाबादेत २५ मिनिटांत तब्बल ५१.२ मिमी एवढा पाऊस कोसळला. बीड, परभणी, श्रीगोंदा, चाळीसगाव येथेही मध्यरात्री पावसाने थैमान घातले.

उष्णतेतील वाढीला जमिनीतून मिळणारी आर्द्रता, त्यामुळे दुपारनंतर कम्युलस ढगांची निर्मिती होते. हे ढग उंचावर गेल्यावर त्यांना गारवा मिळून कमी वेळेत जोरदार पाऊस पडत असल्याचे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.वातावरण बदलामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांत असा पाऊस  पडतो. हा शेतीसाठी उपयोगी नसतो. डॉ. कुलकर्णी म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून परतीचा पाऊस लांबला आहे. आता ऑक्टोबरअखेर उजाडते.

काही वेळेस शहराच्या एका भागात जोरदार पाऊस तर इतर भागात पाऊस नसतो. मान्सूनची माघार लांबल्याने ऑक्टोबरचा पहिल्या १५ दिवसांत वादळी वाऱ्यासह जाेरदार पाऊस होत असतो. तसा तो सध्या होत आहे. अजून १५ दिवस असा पाऊस होऊ शकतो, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

कम्युलस ढग कारणीभूतऑक्टोबरमध्ये सूर्याची किरणे सरळ रेषेत येत असतात. ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो. आकाशातील ढगांचे आच्छादन कमी झालेले असते. त्यामुळे ही किरणे थेट जमिनीवर येतात. त्यात जमिनीमध्ये अजून भरपूर आर्द्रता असते. ऑक्टोबरमध्ये कमी जागेत उंच ढगांची निर्मिती होते. सूर्याच्या उष्णतेमुळे कम्युलस ढगांची निर्मिती होऊन दुपारनंतर असा जोरदार पाऊस पडतो, असे जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले.

टॅग्स :floodपूरFarmerशेतकरी