शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

Maharashtra Government: महाविकास आघाडीने केला सत्तास्थापनेचा दावा, राज्यपालांकडे पत्र सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 06:43 IST

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने अपक्ष व सहयोगी पक्षांसह १६२ आमदारांच्या संख्याबळावर राज्यात तत्काळ सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी

मुंबई : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने अपक्ष व सहयोगी पक्षांसह १६२ आमदारांच्या संख्याबळावर राज्यात तत्काळ सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र सोमवारी राजभवनात सादर केले.शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात हे पत्र सादर केले. या वेळी अशोक चव्हाण, खा. विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, के.पी. पाडवी आदी उपस्थित होते.२३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली; परंतु पूर्वी विधानसभा सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शवली होती. आजदेखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरतील. त्यामुळे आम्ही आताच सरकार स्थापनेचा दावा करीत आहोत. शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस व सहयोगी आणि अपक्ष सदस्य यांची सह्यांनिशी यादी सोबत जोडत आहोत. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्यास तत्काळ पाचारण करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.दूध का दूध, पानी का पानीएकनाथ शिंदे म्हणाले की, फडणवीस यांनी घेतलेली शपथ लोकशाहीविरोधी आहे. त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ पूर्वीही नव्हते व आजही नाही. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असून, राज्यपालांनी वेळ वाढवून दिला नाही. आता विधानसभेत आम्ही दूध का दूध, पानी का पानी सिद्ध करू.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019