शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Government: महाविकास आघाडीने केला सत्तास्थापनेचा दावा, राज्यपालांकडे पत्र सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 06:43 IST

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने अपक्ष व सहयोगी पक्षांसह १६२ आमदारांच्या संख्याबळावर राज्यात तत्काळ सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी

मुंबई : शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने अपक्ष व सहयोगी पक्षांसह १६२ आमदारांच्या संख्याबळावर राज्यात तत्काळ सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी विनंती करणारे पत्र सोमवारी राजभवनात सादर केले.शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील व काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र दिले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत असल्यामुळे त्यांच्या कार्यालयात हे पत्र सादर केले. या वेळी अशोक चव्हाण, खा. विनायक राऊत, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, के.पी. पाडवी आदी उपस्थित होते.२३ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली; परंतु पूर्वी विधानसभा सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सरकार स्थापण्यास असमर्थता दर्शवली होती. आजदेखील त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरतील. त्यामुळे आम्ही आताच सरकार स्थापनेचा दावा करीत आहोत. शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेस व सहयोगी आणि अपक्ष सदस्य यांची सह्यांनिशी यादी सोबत जोडत आहोत. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्यास तत्काळ पाचारण करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.दूध का दूध, पानी का पानीएकनाथ शिंदे म्हणाले की, फडणवीस यांनी घेतलेली शपथ लोकशाहीविरोधी आहे. त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ पूर्वीही नव्हते व आजही नाही. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असून, राज्यपालांनी वेळ वाढवून दिला नाही. आता विधानसभेत आम्ही दूध का दूध, पानी का पानी सिद्ध करू.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019