शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:38 IST

"तेत्रा युगात बजरंगबली होते, इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या या समरात नेते मंडळींमध्ये आरोप प्रत्यारोप आणि जबरदस्तत वाकयुद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे (BJP) फायरब्रँड नेते तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी अमरावतीमध्ये एका प्रचारसभेदरम्यान मोठे विधान केले आहे. 'तेत्रा युगात बजरंगबली होते, इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती,' असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ? -आपल्या भाषणादरम्यान योगी आदित्यनाथ आपल्या पद्धतीने काही जुन्या घटनांची आठवण हिंदू मतदारांना करून देताना दिसत आहेत. हनुमान चालिसा आणि नवनित राणा, मुद्द्याचा उल्केख करत योगी म्हणाले, "जरा आठवा, जेव्हा बजरंग बली असतील, त्रेतायुगात, तेव्हा तर इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती. आज आम्ही हनुमान चालिसेचे पठण करत आहोत, राम नवमीची शोभा यात्रा काढत आहोत, तर तिला प्रतिबंध घातले जातात, ती आडवली जाते, कशामुळे? आणि ज्यांना बजरंगबली पसंत नाहीत, त्यांनी जे पसंत आहे, तेथे जावे. भारतात कोण असा भारतीय असेल, प्रभू रामचंद्रांना मानत नसेल, बजरंगबलींना मानत नसेल."

योगी पुढे म्हणाले, "बंधू आणि भगिनींनो मी येथे आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी आलो आहे की, निवडणूक राष्ट्र धर्माची निवडणूक आहे. आपले सर्व काही देशाच्या नावे असायला हवे. प्रत्येक काम देशाच्या नावे. आपले व्यक्तिगत कसलेही अस्तित्व नाही. आपले सर्व काही देशासाठी असायला हवे. जे देशाच्या हिताचे असेल, तेच आपल्या हिताचे आहे. जे शाच्या विरुद्ध आहेत, ते आपल्याही विरुद्ध आहे. याच संकल्पासह आपण महाराष्ट्राची निवडणूकही घ्याची आहे. जर देशाच्या हितात महायुतीचे सरकार येणार आहे, तर कुठल्याही परिस्थितीत येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आणायचे आहे. हेच आवाहन करण्यासाठी मी येथे आलो आहे."   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाElectionनिवडणूक 2024