शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:38 IST

"तेत्रा युगात बजरंगबली होते, इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या या समरात नेते मंडळींमध्ये आरोप प्रत्यारोप आणि जबरदस्तत वाकयुद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे (BJP) फायरब्रँड नेते तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी अमरावतीमध्ये एका प्रचारसभेदरम्यान मोठे विधान केले आहे. 'तेत्रा युगात बजरंगबली होते, इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती,' असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ? -आपल्या भाषणादरम्यान योगी आदित्यनाथ आपल्या पद्धतीने काही जुन्या घटनांची आठवण हिंदू मतदारांना करून देताना दिसत आहेत. हनुमान चालिसा आणि नवनित राणा, मुद्द्याचा उल्केख करत योगी म्हणाले, "जरा आठवा, जेव्हा बजरंग बली असतील, त्रेतायुगात, तेव्हा तर इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती. आज आम्ही हनुमान चालिसेचे पठण करत आहोत, राम नवमीची शोभा यात्रा काढत आहोत, तर तिला प्रतिबंध घातले जातात, ती आडवली जाते, कशामुळे? आणि ज्यांना बजरंगबली पसंत नाहीत, त्यांनी जे पसंत आहे, तेथे जावे. भारतात कोण असा भारतीय असेल, प्रभू रामचंद्रांना मानत नसेल, बजरंगबलींना मानत नसेल."

योगी पुढे म्हणाले, "बंधू आणि भगिनींनो मी येथे आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी आलो आहे की, निवडणूक राष्ट्र धर्माची निवडणूक आहे. आपले सर्व काही देशाच्या नावे असायला हवे. प्रत्येक काम देशाच्या नावे. आपले व्यक्तिगत कसलेही अस्तित्व नाही. आपले सर्व काही देशासाठी असायला हवे. जे देशाच्या हिताचे असेल, तेच आपल्या हिताचे आहे. जे शाच्या विरुद्ध आहेत, ते आपल्याही विरुद्ध आहे. याच संकल्पासह आपण महाराष्ट्राची निवडणूकही घ्याची आहे. जर देशाच्या हितात महायुतीचे सरकार येणार आहे, तर कुठल्याही परिस्थितीत येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आणायचे आहे. हेच आवाहन करण्यासाठी मी येथे आलो आहे."   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाElectionनिवडणूक 2024