शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महाराष्ट्र निवडणूक 2019: कोण अडून बसलं हे योग्य वेळी कळेलच; मुनगंटीवाराचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 15:41 IST

भाजपा शिवसेनेमधील सुंदोपसुंदी संपेना; सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही

मुंबई: भाजपा, शिवसेनेला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे राज्यातील सत्तेचा तिढा कायम आहे. त्यातच शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत भाजपावर दबाव वाढवला आहे. यावर आज वनमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं. वाघ कुठलाही असो, कुणाचाही असो, त्याचं संरक्षण होणारच, असं म्हणत मुनगंटीवार यांनी सत्ता वाटपाबद्दल लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपावरून दबावाचं राजकारण सुरू असल्यानं महायुतीतला तणाव वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिले. अवकाळी पाऊस आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या संबंधित विषयावर बैठक असल्यानं शिवसेनेचे नेते बैठकीला उपस्थित राहिल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं. बैठक संपल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सत्ता स्थापनेपेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचं म्हटलं. त्यावेळी त्यांनी सरकार लवकर स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. वाघ कुठलाही असो, कुणाचाही असो, त्याचं संरक्षण होणारच, असंदेखील ते म्हणाले. सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि गोड बातमी मिळेल. कोण अडून बसलं हे योग्य वेळी कळेल, असं मुनगंटीवार म्हणाले.चार दिवसांपूर्वीदेखील शिवसेनेबद्दल भाष्य करताना मुनगंटीवार यांनी वाघाचा उल्लेख केला होता. वाघ अग्रलेख लिहून गुरगुरणार असेल, तर मी वनमंत्री आहे. वाघाचं संवर्धन आणि संरक्षण कसं करतात याची मला कल्पना आहे. शिवसेना भाजपची युती टिकण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले. त्यामुळे आता वाघ गुरगुरत असला, तरी त्याला सोबत घ्यायचंच आहे, असं मुनगंटीवार म्हणाले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार