शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

महाराष्ट्र निवडणूक २०१९: बंद पडलेले ईव्हीएम बदलण्यास लागतोय वेळ; यंत्रणा ठरतेय कुचकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 13:24 IST

सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही मतदान केंद्रांवर याचवेळी ईव्हीम सुरू झाले नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानाला आज सुरूवात झाली असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाला अपयश येत आहे. पावसाने रिपरिप सुरू ठेवलेली असताना मतदार राजाने पाठ फिरविली आहे, मात्र ईव्हीएम बिघाडही तेवढाच कारणीभूत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे आदित्या ठाकरे लढवत असलेल्या वरळीत तर दोन तासांपासून नव्या ईव्हीएमच्या प्रतिक्षेत मतदार ताटकळले आहेत.

सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. काही मतदान केंद्रांवर याचवेळी ईव्हीम सुरू झाले नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तर एका केंद्रावर केवळ एक मत पडले असताना ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. बंद पडलेले मतदान यंत्राची तक्रार करून दुसरे पर्यायी यंत्र मागविण्यामध्ये तास ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. क्कलकुवा मतदारसंघातील त्रिशुल ता़ धडगाव  येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तब्बल 5 किमी दगड गोट्यांमधून पायपीट करून मतदान यंत्र पोहोचविण्यात आले आहे. 

तर वणी विधानसभा मतदार संघातील नांदेपेरा येथील मतदान केंद्र क्रमांक ५५ वरील मतदान यंत्र दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक बंद झाले. त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला. आता नवीन मशीन लावण्याची प्रक्रिया सुरू असून त्यालाही दीड तास लागतील, असे मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पांढरकवडा(यवतमाळ) येथील नगर परिषद उर्दु शाळा केंद्रावर मतदान यंत्र काम करत नव्हते. त्यामुळे जवळपास अर्धा तास मतदान खोळंबले होते. त्यानंतर यंत्र दुरूस्त करण्यात आले.

अशा प्रकारे मतदान यंत्रे बंद पडत असल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये संतापाचे वातावरण असून बरेचजण मतदान न करताच माघारी परतत आहेत. तर नांदेपेरा येथील मतदान यंत्र बंद पडल्याने महिला मतदारांनी मतदान केंद्राच्या व्हरंड्यात ठिय्या दिला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019EVM Machineएव्हीएम मशीन