शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Maharashtra Election 2019: 'दलालांना स्थान देऊ नका; कणकवलीचं पार्सल रिटर्न पाठवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 20:41 IST

Maharashtra Election 2019: संजय राऊत यांचा घणाघात; राजन तेलींवर कडाडून टीका

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघ हा शांततामय आहे. येथे कुणाची दादागिरी खपवून घेऊ नका. कणकवलीचे पार्सल कणकवलीला पुन्हा पाठवून द्या. या भूमीत दलालांना स्थान देऊ नका, अशी जोरदार टीका शिवसेना नेते खासदार संजय राउत यांनी केली. सावंतवाडी येथे जाहीर प्रचारसभेत राऊत बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अरूण दुधवडकर, शैलेश परब, अनारोजीन लोबो, बाबू कुडतरकर, वसंत केसरकर आदी उपस्थित होते.

खासदार राऊत म्हणाले, सावंतवाडीचा विकास हा खऱ्या अर्थाने करण्यात केसरकरांचा वाटा मोठा आहे. पण काहींना सगळीकडेच राजकारण दिसते. त्याला तुम्ही आणि आम्ही काय करणार पण आता गप्प बसून चालणार नाही, सर्वांनी पेटून उठले पाहिजे जर हे असेच चालू राहिले तर मागील काही वर्षात कणकवलीची स्थिती झाली तशी ती सावंतवाडीची होईल, त्यामुळे आता सर्वांनी कामाला लागा आणि कणकवलीचे पार्सल कणकवलीला पुन्हा पाठवून द्या, या भूमीची एक ओळख आहे. येथे दलालांना अजिबात स्थान देऊ नका, असे आवाहनही यावेळी खासदार राऊत यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपला स्वाभिमान आता भाजपमध्ये विलीन केल्याने स्वाभिमान शब्दाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पण आम्ही या राणेंचा दोनदा पराभव केला असून, आता कणकवलीत मुलाचाही पराभव करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार विनायक राऊत म्हणाले, केसरकर हे निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कोणी कितीही आरोप प्रत्यारोप करू दे, पण तेलीवर विश्वास ठेवणार नाही. कणकवलीतून येथे येऊन राजकारण करू नका, येथील जनता हुशार आहे, असा टोलाही राऊत यांनी हाणला. जान्हवी सावंत यांनी तेलीवर अनेक गुन्हे आहेत. पण त्यांनी ते लपवून ठेवल्याची टीका केली आहे. पण एक ना एक दिवस यांचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. कणकवलीतील जनता यांना विचारत नाही म्हणून ते आता सावंतवाडीत येऊन राजकारण करू पाहात आहेत. असा आरोपही सावंत यांनी यावेळी केला

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाkankavli-acकणकवलीDeepak Kesarkarदीपक केसरकर