शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

महाराष्ट्र निवडणूक 2019: फडणवीसांच्या राजीनाम्यावर 'मिसेस मुख्यमंत्री' म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 10:19 IST

अमृता फडणवीस यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या भावना

मुंबई: निवडणूक निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या काही तास आधी फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या राजीनाम्याचं पत्नी अमृता यांनी कौतुक केलं आहे. मला तुमच्या निर्णयाचा आणि भूमिकेचा अभिमान वाटतो, असं ट्विट अमृता यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा, महाराष्ट्र भाजपाला टॅगदेखील केलं आहे. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. निवडणूक निकाल जाहीर होऊन 2 आठवडे पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील सत्तेचा तिढा कायम आहे.  राज्यातील मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला. मात्र शिवसेना, भाजपाला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आला नाही. शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. त्यासाठी शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. मात्र त्यावेळी अशा प्रकारचा कोणताही शब्द शिवसेनेला देण्यात आला नव्हता, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यांनी ते घेतले नाहीत असं सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. माझे फोन घ्यायला वेळ नाही. मात्र विरोधकांशी चर्चा करायला त्यांना वेळ आहे, असा आक्षेप फडणवीस यांनी नोंदवला. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची माणसं जी वक्तव्यं करताहेत, त्यामुळे सरकार स्थापन होत नाही. आम्ही प्रत्युत्तर देऊ शकत नाही, असं समजू नका. तुमच्या भाषेपेक्षा जास्त प्रभावी भाषा आम्ही वापरू शकतो. पण आम्ही तसं करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmruta Fadnavisअमृता फडणवीस