शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

Maharashtra Election 2019 : दिवाळीपूर्वीच्या निकालाने अनेकांच्या पदरी निराशा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 1:13 AM

राज्याच्या निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत, ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबरला म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी देण्याचे आधीच जाहीर केले आहे पण त्यामुळे दिवाळीसारख्या आनंदाच्या उत्सवकाळात पराभूत उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे हजारो समर्थक नक्कीच खूश नसतील. दिवाळीआधी मतदान आणि दिवाळीनंतर निकाल असे केले असते तर ते टाळता आले असते आणि निकालाच्या निमित्ताने येणारी राजकीय कटूता ऐनदिवाळीत आली नसती.अर्थात, आता निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, आयोगाने आधीच या बाबतचा विचार करायला हवा होता, असे विविध पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये १५ आॅक्टोबरला मतदान झाले आणि १९ आॅक्टोबरला निकाल जाहीर करण्यात आला होता. मतदान आणि निकाल यात तीन दिवसांचे अंतर होते. यावेळी ते दोनच दिवसांचे आहे. मतदानानंतर किती दिवसांनी मतमोजणी झाली पाहिजे या बाबतचा काही नियम नाही. परिस्थितीनुसार त्या बाबतचा निर्णय आयोगाला घेता येतो.येत्या दहा-बारा दिवसात प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. मुंबईपासून गल्लीपर्यंत एकमेकांचे उणेदुणे काढले जाईल आणि २१ तारखेच्या मतदानापर्यंत ही कटूता शिगेला पोहोचलेली असेल. शेवटी निवडून येणार ते २८८ जणच. राज्याच्या निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत, ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत. याचा अर्थ पराभूत होणाऱ्या उमेदवारांची संख्या २९५१ असेल. एवढे उमेदवार, त्यांचे कुटुंबीय, नातेवाइक आणि हजारो समर्थकांची दिवाळी केवळ निकालामुळे गोड होणार नाही.पराभूत उमेदवारांच्या समर्थकांचा हिरमोडदसरा आणि दिवाळीच्या दरम्यान होणारी निवडणूक आणि निकाल यामुळे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची यंदा खºया अर्थाने दिवाळी आहे असे म्हटले जात आहे. तथापि, असे हजारो निष्ठावंत कार्यकर्ते आजही आहेत की जे पदरमोड करून आपापल्या पक्षाचा प्रचार करतात. असे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांच्यासाठी झटले ते पराभूत झाल्यानंतर त्यांनाही दिवाळीचा फारसा आनंद नसेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019