शहरं
Join us  
Trending Stories
1
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
2
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
4
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
5
T20 World Cup 2026 Schedule : कधी अन् कुठं रंगणार IND vs PAK यांच्यातील सामना? मोठी माहिती आली समोर
6
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचा भारत दौरा पुन्हा लांबणीवर! कारण काय? 
7
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
8
धर्मेंद्र यांचे चाहते सनी-बॉबी देओलवर नाराज, म्हणाले- आयुष्यात त्यांचे सिनेमे पाहणार नाही !
9
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
10
'यमला पगला दीवाना' टायटल मीच धर्मेंद्र यांना दिलेलं..., सचिन पिळगावकरांनी सांगितला किस्सा
11
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
12
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
13
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
14
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
15
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
16
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
17
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
18
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
19
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
20
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : दिवाळीपूर्वीच्या निकालाने अनेकांच्या पदरी निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 01:13 IST

राज्याच्या निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत, ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत.

मुंबई : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबरला म्हणजे दिवाळीच्या एक दिवस आधी देण्याचे आधीच जाहीर केले आहे पण त्यामुळे दिवाळीसारख्या आनंदाच्या उत्सवकाळात पराभूत उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे हजारो समर्थक नक्कीच खूश नसतील. दिवाळीआधी मतदान आणि दिवाळीनंतर निकाल असे केले असते तर ते टाळता आले असते आणि निकालाच्या निमित्ताने येणारी राजकीय कटूता ऐनदिवाळीत आली नसती.अर्थात, आता निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, आयोगाने आधीच या बाबतचा विचार करायला हवा होता, असे विविध पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये १५ आॅक्टोबरला मतदान झाले आणि १९ आॅक्टोबरला निकाल जाहीर करण्यात आला होता. मतदान आणि निकाल यात तीन दिवसांचे अंतर होते. यावेळी ते दोनच दिवसांचे आहे. मतदानानंतर किती दिवसांनी मतमोजणी झाली पाहिजे या बाबतचा काही नियम नाही. परिस्थितीनुसार त्या बाबतचा निर्णय आयोगाला घेता येतो.येत्या दहा-बारा दिवसात प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील. मुंबईपासून गल्लीपर्यंत एकमेकांचे उणेदुणे काढले जाईल आणि २१ तारखेच्या मतदानापर्यंत ही कटूता शिगेला पोहोचलेली असेल. शेवटी निवडून येणार ते २८८ जणच. राज्याच्या निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत, ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात आहेत. याचा अर्थ पराभूत होणाऱ्या उमेदवारांची संख्या २९५१ असेल. एवढे उमेदवार, त्यांचे कुटुंबीय, नातेवाइक आणि हजारो समर्थकांची दिवाळी केवळ निकालामुळे गोड होणार नाही.पराभूत उमेदवारांच्या समर्थकांचा हिरमोडदसरा आणि दिवाळीच्या दरम्यान होणारी निवडणूक आणि निकाल यामुळे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची यंदा खºया अर्थाने दिवाळी आहे असे म्हटले जात आहे. तथापि, असे हजारो निष्ठावंत कार्यकर्ते आजही आहेत की जे पदरमोड करून आपापल्या पक्षाचा प्रचार करतात. असे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांच्यासाठी झटले ते पराभूत झाल्यानंतर त्यांनाही दिवाळीचा फारसा आनंद नसेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019