शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा

By अतुल कुलकर्णी | Updated: October 12, 2019 01:31 IST

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते.

- अतुल कुलकर्णीनिवडणुकीच्या तोंडावर केलेली कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारा प्रश्न आहे. गावोगावी फिरताना अनेक शेतकरी हा मुद्दा बोलून दाखवतात. लोक देशाविषयी किंवा राज्यातल्या प्रमुख प्रश्नाविषयी बोलतात असे दिसत नाही पण त्यांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न मात्र पोटतिडकीने मांडतात, असा अनुभव अनेक ठिकाणी येत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे-पाटील यांचाही तोच मुद्दा आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते. मतदार संघात कुठेही स्पर्धा दिसली नाही. शिवसेनेला उमेदवार हवा तो मिळाला नाही. माजी खा. आढळराव पाटील किंवा त्यांच्या मुलाने विधानसभा लढवावी असा आग्रह झाला, मात्र ऐन वेळी दोघांनीही निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेने शोधून एक उमेदवार दिला. राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात जातीय समीकरणे आहेत.

अमूक जातीची एवढी मते तमूक जातीची तेवढी मते असा प्रकार आंबेगाव मतदारसंघात दिसत नाही. यावरून विचारले असता कोळसे-पाटील म्हणाले, माझी ही सातवी निवडणूक आहे. आजपर्यंत कधीही माझ्या मतदारसंघात जातीवरून मतदान झाले नाही. आम्ही आंबेडकर जयंती, ईद, दिवाळी अशा सण उत्सवात भेटतो; मिसळतो. एकमेकांचे सामाजिक कार्यक्रम करतो पण मतदारसंघात जातीवर कधीच मतदान झालेले नाही. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले हे मूळ शिवसैनिक नाहीत असाही एक आक्षेप या मतदारसंघात आहे. ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर कडवी टीका केली होती, तेच आता शिवसेनेचे उमेदवार आहेत. हा मुद्दादेखील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात चर्चेत आहे.

अनुसया महिला उन्नती केंद्र या माध्यमातून महिला कार्यकर्त्यांची तयार केलेली टीम आज आपल्या कामी येत आहे से सांगून वळसे पाटील म्हणाले, मतदार संघात महिला मेळावा आयोजित करायचे ठरवले तर छोट्या सूचनेवरही पंधरा ते वीस हजार महिला एकत्र जमू शकतात. ती आपली जमेची बाजू आहे. या महिला, अन्य महिलांसाठी शासकीय पातळीवरची छोटी मोठी कामे करून देण्यात पुढाकार घेतात. त्यामुळे यांच्याविषयी मतदारसंघात आदराची भावना आहे ती आज माझ्या प्रचारात मदतीला आली आहे. प्रचाराची रणधुमाळी नाही. कसली गडबड नाही. शांतपणे सकाळी उठायचे, प्रचाराला जायचे, मतदारसंघात भेटीगाठी घ्यायच्या, गावात कुठेतरी दुपारचे जेवण करायचे, पुन्हा भेटीगाठी करत संध्याकाळच्या वेळेला एखादी सभा घ्यायची असा शांत आणि निवांत प्रचार या मतदारसंघात पहायला मिळत आहे.

टॅग्स :onionकांदाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019