शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

Maharashtra Election 2019 : कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा

By अतुल कुलकर्णी | Updated: October 12, 2019 01:31 IST

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते.

- अतुल कुलकर्णीनिवडणुकीच्या तोंडावर केलेली कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारा प्रश्न आहे. गावोगावी फिरताना अनेक शेतकरी हा मुद्दा बोलून दाखवतात. लोक देशाविषयी किंवा राज्यातल्या प्रमुख प्रश्नाविषयी बोलतात असे दिसत नाही पण त्यांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न मात्र पोटतिडकीने मांडतात, असा अनुभव अनेक ठिकाणी येत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे-पाटील यांचाही तोच मुद्दा आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते. मतदार संघात कुठेही स्पर्धा दिसली नाही. शिवसेनेला उमेदवार हवा तो मिळाला नाही. माजी खा. आढळराव पाटील किंवा त्यांच्या मुलाने विधानसभा लढवावी असा आग्रह झाला, मात्र ऐन वेळी दोघांनीही निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेने शोधून एक उमेदवार दिला. राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात जातीय समीकरणे आहेत.

अमूक जातीची एवढी मते तमूक जातीची तेवढी मते असा प्रकार आंबेगाव मतदारसंघात दिसत नाही. यावरून विचारले असता कोळसे-पाटील म्हणाले, माझी ही सातवी निवडणूक आहे. आजपर्यंत कधीही माझ्या मतदारसंघात जातीवरून मतदान झाले नाही. आम्ही आंबेडकर जयंती, ईद, दिवाळी अशा सण उत्सवात भेटतो; मिसळतो. एकमेकांचे सामाजिक कार्यक्रम करतो पण मतदारसंघात जातीवर कधीच मतदान झालेले नाही. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले हे मूळ शिवसैनिक नाहीत असाही एक आक्षेप या मतदारसंघात आहे. ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर कडवी टीका केली होती, तेच आता शिवसेनेचे उमेदवार आहेत. हा मुद्दादेखील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात चर्चेत आहे.

अनुसया महिला उन्नती केंद्र या माध्यमातून महिला कार्यकर्त्यांची तयार केलेली टीम आज आपल्या कामी येत आहे से सांगून वळसे पाटील म्हणाले, मतदार संघात महिला मेळावा आयोजित करायचे ठरवले तर छोट्या सूचनेवरही पंधरा ते वीस हजार महिला एकत्र जमू शकतात. ती आपली जमेची बाजू आहे. या महिला, अन्य महिलांसाठी शासकीय पातळीवरची छोटी मोठी कामे करून देण्यात पुढाकार घेतात. त्यामुळे यांच्याविषयी मतदारसंघात आदराची भावना आहे ती आज माझ्या प्रचारात मदतीला आली आहे. प्रचाराची रणधुमाळी नाही. कसली गडबड नाही. शांतपणे सकाळी उठायचे, प्रचाराला जायचे, मतदारसंघात भेटीगाठी घ्यायच्या, गावात कुठेतरी दुपारचे जेवण करायचे, पुन्हा भेटीगाठी करत संध्याकाळच्या वेळेला एखादी सभा घ्यायची असा शांत आणि निवांत प्रचार या मतदारसंघात पहायला मिळत आहे.

टॅग्स :onionकांदाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019