शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

महाराष्ट्र निवडणूक 2019 : नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या 'अनपेक्षित' निकालावर मोजकंच बोलले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 19:27 IST

महाराष्ट्रातल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही.

मुंबईः महाराष्ट्रातल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. भाजपा 122वरून घसरून 102 जागांवर आली आहे. तर शिवसेनासुद्धा 57च्या जवळपास जागा जिंकण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपाचं एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र आहे. दोघांनीही जनतेचा कौल स्वीकारला असल्याचे सूतोवाच केले. त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या विजयाबद्दल जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.ट्विट करत ते म्हणाले, एनडीएला जनतेनं दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मी आभारी आहे. जनतेनं पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी आभारी आहे. आम्ही महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहू, प्रत्येक कार्यकर्ता मग तो भाजपाचा असो, शिवसेनेचा असो किंवा एनडीएचा असो, त्यांनी केलेल्या कामासाठी मी त्यांना सलाम करतो. विधानसभा निवडणुकीचा कल हाती आल्यानंतर शिवसेनेनेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत भाजपाला सूचक इशारे दिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करून देत शिवसेना पक्षप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं जे ठरलं आहे, त्यानुसार होईल, असे उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीचे कल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. यावेळी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री म्हणाले की, ''राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. तसेच सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत म्हणायचे तर आमचं जे ठरलं आहे त्यानुसार सारं काही होईल.'' तर दुसरीकडे शिवसेनेही आता आम्ही तुमची अडचण सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019