शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

महाराष्ट्र निवडणूक 2019 : नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या 'अनपेक्षित' निकालावर मोजकंच बोलले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 19:27 IST

महाराष्ट्रातल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही.

मुंबईः महाराष्ट्रातल्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. भाजपा 122वरून घसरून 102 जागांवर आली आहे. तर शिवसेनासुद्धा 57च्या जवळपास जागा जिंकण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपाचं एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र आहे. दोघांनीही जनतेचा कौल स्वीकारला असल्याचे सूतोवाच केले. त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या विजयाबद्दल जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.ट्विट करत ते म्हणाले, एनडीएला जनतेनं दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल मी आभारी आहे. जनतेनं पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी आभारी आहे. आम्ही महाराष्ट्राच्या प्रगती आणि विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहू, प्रत्येक कार्यकर्ता मग तो भाजपाचा असो, शिवसेनेचा असो किंवा एनडीएचा असो, त्यांनी केलेल्या कामासाठी मी त्यांना सलाम करतो. विधानसभा निवडणुकीचा कल हाती आल्यानंतर शिवसेनेनेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत भाजपाला सूचक इशारे दिले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करून देत शिवसेना पक्षप्रमुखांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं जे ठरलं आहे, त्यानुसार होईल, असे उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीचे कल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले. यावेळी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री म्हणाले की, ''राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. तसेच सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत म्हणायचे तर आमचं जे ठरलं आहे त्यानुसार सारं काही होईल.'' तर दुसरीकडे शिवसेनेही आता आम्ही तुमची अडचण सहन करणार नसल्याचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019