शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

Maharashtra Election 2019: 'गेल्यावेळी ६३ आमदार होते यंदा दुप्पट निवडून येण्यासाठी आशीर्वाद द्या' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 14:43 IST

पुरंदर विधानसभा निवडणूक २०१९ - १९९७ मध्ये पुरंदरमध्ये उपसा सिंचन योजना आणली होती. मात्र दुर्दैवाने सरकार बदललं २० वर्षे ही योजना रखडली

पुरंदर - मागील निवडणुकीत जनतेने ६३ आमदार दिले होते, यावेळी यंदा या जागा दुप्पट करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्या, महाआघाडीची महाबिघाडी झाली आहे. नवा महाराष्ट्रासाठी मला सगळ्यांची सोबत हवी असं आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आशीर्वाद द्यायचा असेल तर शिवसेनेला मतदान करा. पहिल्यांदा मी आमदार म्हणून निवडून जाणार आहे. विजय शिवतारेंकडून मला खूप शिकण्याची इच्छा आहे म्हणून त्यांना निवडून द्या. विजय शिवतारेंची गरज महाराष्ट्राला आहे. याठिकाणी दुष्काळामुळे लोकांच्या आत्महत्या होत आहे. पण तुम्ही कोणत्याही पक्षात असाल दुष्काळामुळे आत्महत्या करु नका. आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नका, शिवसेनेचा विचार आणा असं त्यांनी सांगितले. 

तसेच १९९७ मध्ये पुरंदरमध्ये उपसा सिंचन योजना आणली होती. मात्र दुर्दैवाने सरकार बदललं २० वर्षे ही योजना रखडली. या योजनेसाठी सर्वपक्षीय शेतकरी संघटना मला भेटली मला निवेदन दिलं. त्या निवेदनाची कॉपी मी व्हॉट्सअप विजय शिवतारेंनी पाठविली, अवघ्या ४ दिवसांत हा प्रकल्प मार्गी लागला. येत्या ६ महिन्यात ही योजना पूर्ण होऊन तेथील जमीन सुपीक होईल. त्यामुळे मला नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी अशा माणसांची गरज आहे. कितीतरी गोष्टी महाराष्ट्रात करायच्या आहेत त्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन आदित्य ठाकरेंनी यावेळी केलं. 

दरम्यान, २०१४ मध्ये मी बोललो होतो विजय शिवतारेंकडे मोठी जबाबदारी येणार आहे, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मंत्रीपद दिलं. पुरंदरसाठी १० हजार कोटी रुपये विजय शिवतारेंनी आणलेत. मुख्यमंत्र्यांनी एवढा निधी त्यांच्या मतदारसंघात नेला नसेल, अर्थात मुख्यमंत्र्याकडे महाराष्ट्र असतो. सत्तेत असूनही शिवसेना शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आंदोलन केली, सरसकट कर्जमुक्ती केल्याशिवाय गप्प बसणार नाही, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये द्यायचे आहेत. महाराष्ट्रातील ५० हजार किमी रस्ते मला सिमेंट कॉंक्रिटचे करायचे आहे. मुंबईतील ५०० शाळांना व्हर्चुअल क्लासरुमच्या माध्यमातून जोडलं आहे हेच मला महाराष्ट्रात करायचं आहे असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019purandar-acपुरंदर