शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Maharashtra Election 2019: 'गेल्यावेळी ६३ आमदार होते यंदा दुप्पट निवडून येण्यासाठी आशीर्वाद द्या' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 14:43 IST

पुरंदर विधानसभा निवडणूक २०१९ - १९९७ मध्ये पुरंदरमध्ये उपसा सिंचन योजना आणली होती. मात्र दुर्दैवाने सरकार बदललं २० वर्षे ही योजना रखडली

पुरंदर - मागील निवडणुकीत जनतेने ६३ आमदार दिले होते, यावेळी यंदा या जागा दुप्पट करण्यासाठी आलो आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्या, महाआघाडीची महाबिघाडी झाली आहे. नवा महाराष्ट्रासाठी मला सगळ्यांची सोबत हवी असं आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, आशीर्वाद द्यायचा असेल तर शिवसेनेला मतदान करा. पहिल्यांदा मी आमदार म्हणून निवडून जाणार आहे. विजय शिवतारेंकडून मला खूप शिकण्याची इच्छा आहे म्हणून त्यांना निवडून द्या. विजय शिवतारेंची गरज महाराष्ट्राला आहे. याठिकाणी दुष्काळामुळे लोकांच्या आत्महत्या होत आहे. पण तुम्ही कोणत्याही पक्षात असाल दुष्काळामुळे आत्महत्या करु नका. आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नका, शिवसेनेचा विचार आणा असं त्यांनी सांगितले. 

तसेच १९९७ मध्ये पुरंदरमध्ये उपसा सिंचन योजना आणली होती. मात्र दुर्दैवाने सरकार बदललं २० वर्षे ही योजना रखडली. या योजनेसाठी सर्वपक्षीय शेतकरी संघटना मला भेटली मला निवेदन दिलं. त्या निवेदनाची कॉपी मी व्हॉट्सअप विजय शिवतारेंनी पाठविली, अवघ्या ४ दिवसांत हा प्रकल्प मार्गी लागला. येत्या ६ महिन्यात ही योजना पूर्ण होऊन तेथील जमीन सुपीक होईल. त्यामुळे मला नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी अशा माणसांची गरज आहे. कितीतरी गोष्टी महाराष्ट्रात करायच्या आहेत त्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन आदित्य ठाकरेंनी यावेळी केलं. 

दरम्यान, २०१४ मध्ये मी बोललो होतो विजय शिवतारेंकडे मोठी जबाबदारी येणार आहे, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मंत्रीपद दिलं. पुरंदरसाठी १० हजार कोटी रुपये विजय शिवतारेंनी आणलेत. मुख्यमंत्र्यांनी एवढा निधी त्यांच्या मतदारसंघात नेला नसेल, अर्थात मुख्यमंत्र्याकडे महाराष्ट्र असतो. सत्तेत असूनही शिवसेना शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आंदोलन केली, सरसकट कर्जमुक्ती केल्याशिवाय गप्प बसणार नाही, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये द्यायचे आहेत. महाराष्ट्रातील ५० हजार किमी रस्ते मला सिमेंट कॉंक्रिटचे करायचे आहे. मुंबईतील ५०० शाळांना व्हर्चुअल क्लासरुमच्या माध्यमातून जोडलं आहे हेच मला महाराष्ट्रात करायचं आहे असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019purandar-acपुरंदर