शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

दहा रुपयांच्या थाळीमागचं गणित; 'राजकारण' वजा केल्यास बरोब्बर होईल 'उदरभरण'!

By प्रविण मरगळे | Updated: October 15, 2019 13:14 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९- महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही अशी ही योजना आहे. वाढलेल्या उत्पन्नातून हा खर्च केला जाईल त्यासाठी वेगळा कर लादला जाणार नाही असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

प्रविण मरगळे 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचाराला वेग आलेला आहे. प्रत्येक पक्ष जनतेपर्यंत पोहचण्यासाठी विविध आश्वासनांची खैरात देत आहे. शिवसेनेनेही त्यांच्या वचननाम्यात १० रुपयात सकस जेवण देणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. शिवसेनेच्या या घोषणेनंतर राज्यभरातून या योजनेवर टीका सुरु आहे. सोशल मीडियात या योजनेची खिल्ली उडविणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. मूळात ही योजना आणण्यापूर्वी निश्चितच शिवसेनेसारख्या पक्षाने विचार करुन या योजनेचा समावेश वचननाम्यात केला आहे. 

शिवसेनेचं सरकार आल्यास राज्यभरात १० रुपयात जेवण उपलब्ध होणार का? ही योजना लागू झाली तर अंमलबजावणी कशी करणार? यासाठी राज्याच्या तिजोरीवर किती भार येणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र या योजनेचा सारासार विचार केला तरी ही योजना अशक्य आहे असंही नाही. अंबरनाथसारख्या एका शहरामध्ये अशाप्रकारे योजना गेल्या ६ महिन्यापासून एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवसेना राबवित आहे. १० रुपयांत जेवण ही संकल्पना अंबरनाथकरांना भावली आहे. 

विशेषत: या योजनेबाबत सुभाष देसाईंनी सांगितले की, वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी बोलून १० रुपयाची भोजन थाळी देण्याचा निर्णय झाला आहे. मराठमोळ्या जेवणात १-२ चपाती, २-३ भाजी, वरण भात या एका थाळीचा खर्च ४० रुपये आहे. सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर ही योजना लागू करु. यामध्ये १० रुपये ग्राहक देईल तर ३० रुपये सरकार अनुदान देईल. वर्षाकाळी १ हजार कोटी रुपये या योजनेला खर्च येईल. महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही अशी ही योजना आहे. वाढलेल्या उत्पन्नातून हा खर्च केला जाईल त्यासाठी वेगळा कर लादला जाणार नाही असं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

या योजनेबाबत बोलायचं झालं तर सध्या महाराष्ट्रात जी देवस्थानं असतील यात शिर्डीतील साईबाबा देवस्थान, शेगाव येथील गजानन महाराज, गोंदावले येथील गोंदावलेकर महाराज आणि पश्चिम महाराष्ट्रातील संत बाळूमामा देवस्थान यासारख्या अनेक देवस्थानाकडून भाविकांना मोफत जेवण उपलब्ध करुन देण्यात येते. या सुविधांसाठी देवस्थानाला देणगी, अन्नदान करणारे दानशूर यांची मोठी मदत मिळते. शिवसेनेने आणलेली १० रुपयात जेवणाची योजना यावर टीका केली जाते मात्र आजही महाराष्ट्रातील अनेक गरीब मोलमजुरी करुन जगणारे आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवर फूटपाथवर गरीब लोक आहेत ज्यांना अन्न मिळत नाही ते १२ रुपयांचा वडापाव खाऊन दिवस जगतात याकडे दुर्लक्ष करण्यात येते. अशा लोकांसाठी नक्कीच ही योजना फायदेशीर आहे. ग्रामीण भागातही शेतमजूरांना याचा लाभ होणार आहे. 

या योजनेतंर्गत राज्यभरात १ हजार ठिकाणी जेवणाचे केंद्र उभारण्यात येणार आहेत. राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत म्हणजे प्रत्येक मतदारसंघात ३ ते ४ जेवणाचे केंद्र उभारण्यात येतील. या केंद्रासाठी महिला बचत गटांचा आधार घेण्यात येणार असल्याचं शिवसेनेने सांगितले. त्यामुळे या योजनेचा दुहेरी फायदाही होणार आहे. एकीकडे महिलांना रोजगार मिळणार तर दुसरीकडे गरिबांना अन्नही मिळणार आहे. मात्र असं असलं तरी भाजपाकडून शिवसेनेवर होणारी कुरघोडी पाहता ही योजना लागू होईल का यावर प्रश्न आहे. कारण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० रुपयात लोकांना जेवण देणं ही चिंतेची बाब असून लोकांची आर्थिक शक्ती वाढविली पाहिजे असं विधान केलं आहे. त्यामुळे आगामी काळात या योजनेवरुन भाजपा शिवसेनेवर कुरघोडी करणार हे दिसून येत आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे