शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
2
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
3
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
4
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
5
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
6
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
7
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
8
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
9
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
10
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
11
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
12
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
13
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
14
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
15
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
16
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
17
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
18
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
19
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
20
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले

Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 19:53 IST

Eknath Shinde on india pakistan Tensions: युद्धविरामाच्या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानला महत्त्वाचा इशारा दिला.

पाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र, तरीही पाकिस्तान कुरापती करू शकतो, असे बोलले जात आहे. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागले पाहिजे नाही तर त्यांचे नाव जगाच्या नकाशावरून कायमचे गायब करण्याची भारतामध्ये क्षमत आहे, असे शिंदे म्हणाले. 

मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाबाबत बोलताना पाकिस्तानला महत्त्वाचा इशारा दिला. 'पाकिस्तानने दहशतवादी हल्ला करुन सुरुवात केली. त्यांना आपण उत्तर दिले. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाली. मात्र, तरीही पाकिस्तानने बेईमानी केली. पाकिस्तानने अनेकदा युद्धविरामाचे उल्लंघन केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आणखी एक संधी दिली. पण तरीही पाकिस्तानने आपल्या नागरिकांवर हल्ला केला. यानंतर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तान पुन्हा हल्ला करेल, असे भारतीय लष्कराला वाटले. त्यामुळे मोदींनी युद्धविरामाची कुठलीही पोस्ट केली नाही. पाकिस्तान वारंवार अशा गोष्टी करणार असेल तर, त्यांना धडा शिकवला जाईल', असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पण असे आहे की, कुत्र्याची शेपूट वाकडंच राहते. पाकिस्तानची प्रवृत्ती अशीच आहे. कुत्र्याचे शूपट वाकडे असल्यामुळे ते कापले जाते. गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हेच करतील. पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागले पाहिजे. नाही तर पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून गायब करण्याची क्षमता भारतामध्ये आहे.'

जम्मू- काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर हल्ला केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे