शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

महाराष्ट्र डेंग्यूच्या विळख्यात!

By admin | Updated: November 8, 2014 04:08 IST

राज्यात डेंग्यूने थैमान घातले असून, मुंबईत एका डॉक्टरचा यात बळी गेल्याने जनतेत मोठ्या प्रमाणावर भीती पसरलेली आहे. १९ जिल्ह्यात पसरलेल्या डेंग्यूच्या साथीने आजपर्यंत ३१ लोकांचे बळी घेतले

अतुल कुलकर्णी, मुंबईराज्यात डेंग्यूने थैमान घातले असून, मुंबईत एका डॉक्टरचा यात बळी गेल्याने जनतेत मोठ्या प्रमाणावर भीती पसरलेली आहे. १९ जिल्ह्यात पसरलेल्या डेंग्यूच्या साथीने आजपर्यंत ३१ लोकांचे बळी घेतले आहेत. बळींची वाढती संख्या पाहून शुक्रवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. डेंग्यूमुळे महानगरपालिकांच्या हद्दीत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २१ झाली असून, ग्रामीण भागात आजपर्यंत १० बळी गेले आहेत. सगळ्यात मोठी लागण मुंबईत असून, आजपर्यंत ६९६ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून, मुंबईत डेंग्यूने ७ बळी घेतले आहेत. मुंबई महापालिकेच्या स्वच्छता विभागाचा अनागोंदी कारभार यामुळे चव्हाट्यावर आला असून पुणे, ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, मीरा-भार्इंदर, धुळे, औरंगाबाद महानगरपालिकांच्या हद्दीतही हीच अवस्था आहे. जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग, साचलेले पाणी यामुळे डासांची पैदास वाढते़ साचलेले पाणी वेळीच न साफ केल्याने तसेच परिसर कोरडा न ठेवला गेल्याने डेंग्यूची पैदास वाढत असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकाऱ्यांनी दिली. काही वृत्तवाहिन्या डेंग्यूचे ७२ बळी असे वृत्त चालवत आहेत, ते चुकीचे आहे. प्रत्यक्षात ३१ मृत्यू आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग यासाठी गतीने कामाला लागला असून, सर्वत्र यासंबंधीची औषधे देखील पुरवण्यात आल्याचे संचालक सतीश पवार यांनी सांगितले. २०१२ पासून या आजाराने राज्यभरात ३१८ बळी घेतले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, मुंबईत सध्या २२७ फवारणी यंत्रांद्वारे धूर फवारणी केली जात आहे, अशी माहिती आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना दिली.