शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उपचारापुरताच महाराष्ट्र दिन !

By admin | Updated: May 3, 2015 00:25 IST

नुकताच महाराष्ट्र दिन होऊन गेला. या दिवसाच्या आगेमागे महाराष्ट्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष मराठीबद्दल काही ना काही घोषणा करीत असतात.

डॉ. दीपक पवार - नुकताच महाराष्ट्र दिन होऊन गेला. या दिवसाच्या आगेमागे महाराष्ट्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय पक्ष मराठीबद्दल काही ना काही घोषणा करीत असतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो. फेसबुक - टिष्ट्वटर यासारखी माध्यमे लोकप्रिय झाल्यानंतर ‘महाराष्ट्र दिन आहे की दीन’ अशा प्रकारचे सचित्र विनोदही प्रसिद्ध होताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतलेल्या लोकांनी १ मे रोजी कामगार दिनही आहे, हे लक्षात घेऊन त्याच दिवशी महाराष्ट्राची निर्मिती व्हावी, असा आग्रह धरला. पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा कणा असलेला हा कामगार ह्या राज्यात दूरवर फेकला गेला आहे. ज्या बहुजनांच्या विकासाचं स्वप्न अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर यांनी पाहिले आणि डफावर थाप मारून समोरच्या भारलेल्या जनतेपुढे मांडलं, त्या बहुजनांचं परिघीकरण झालं आहे. सत्तेचे आणि भांडवलदारांचे दलाल जागोजागची मचानं हेरून नेम धरून टपून बसले आहेत. श्रीमंतांना हवं असं शहर, राज्य उभारण्यासाठी २४* ७ काम चालू आहे. जवळपास सगळी प्रसारमाध्यमे याच कामाला जुंपलेली आहेत. अपवाद असतीलही, पण ते नियम सिद्ध करण्यापुरतेच आहेत. आपण सगळ््यांनी मिळून जे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले, त्याची आता काय स्थिती आहे? मुंबई शहर पुरतं भांडवलदारांच्या घशात गेलं आहे. तीच अवस्था इतर महानगरांची आणि जिल्ह्यांच्या शहरांची आहे. रावणाला जशी दहा तोंडं तशी आमच्या राजकीय वर्गालाही आहेत. त्यातले काही चेहरे बिल्डर, विकासक यांचे आहेत. याशिवाय साखरसम्राटांपासून दूधसम्राटांपर्यंत इतर सगळे पारंपरिक चेहरे आहेतच. सगळ््यांची तालुक्यापासून राज्यापर्यंत संस्थाने आहेत. त्याचा अधिकृत-अनधिकृत काळा-पांढरा व्यवहार आहे. त्यानी उपकृत केलेल्या माणसांच्या फौजा आहेत. मध्ययुगात असलेल्या भाटचारणांप्रमाणे आजच्या युगातही भाटचारण आहेत. त्याला काधी जनसंपर्काचं तर कधी लाइझनिंगचं नाव आहे. कधी कधी आध्यात्मिक गुरूही ते काम दाम घेऊन करू लागलेत. मंत्रालयात, विधान भवनात मंत्र्यांच्या निवासस्थानाशी लागलेल्या रांगा, दलाल आणि मध्यस्थांची चिठ्ठ्याचपाट्यांची देवाणघेवाण आणि रात्री उशिरा होणारी पेटी - खोक्यांची देवाणघेवाण हे समकालीन महाराष्ट्राचे दागिने आहेत! एखाद्या माणसाला अ‍ॅलर्जी होऊन त्याचं अंग फोडांनी भरून जावं तसा महाराष्ट्राचा नकाशा सद्गुण आणि विवेकाच्या अ‍ॅलर्जीने भरून गेला आहे. म्हणूनच या राज्यात कॉ़ पानसरे, डॉ़ नरेंद्र दाभोळकरांसाख्या विवेकी लोकांना जागा नसते. पण गल्लोगल्लीच्या बाबा-बापूंना मात्र रस्ते अडवून जागा मिळतात. असं राज्य महान लोकांचं राष्ट्र असं मानणं हा गंभीर गुन्हा मानला पाहिजे. मध्यंतरी परेश मोकाशींचा एलिझाबेथ एकादशीसारखा नितांत सुंदर सिनेमा आला. त्यात राणी एलिझाबेथचा उल्लेख आला म्हणून त्या सिनेमावर बंदी घालावी, अशी मागणी वारकऱ्यांच्या पुढाऱ्यांनी केली. विठ्ठलाशी नातं सांगणाऱ्या लोकांनी इतका अडाणीपणा करावा आणि त्यांना महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी एका शब्दानेही बोलू नये, हे लाजिरवाणं आहे. दुसरीकडे जातीअंताची धुरा खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या मंडळींमध्ये जात इतकी खोलवर भिनली आहे, की आता त्यांची प्रमाणपत्रं घेतल्याशिवाय तुम्ही पुरोगामी आहात का हे तुम्हाला सिद्ध करता येत नाही. अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींप्रमाण दुर्मीळ होऊ पाहणारे समाजवादी इतकी अस्पृश्यता पाळतात, की मनुवाद्यांनीही त्यांचं अनुकरण करावं. ही सगळी माणसं समकालीन महाराष्ट्रात आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करतात. मग महाराष्ट्र मोठा कसा होईल? ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले’ असं सेनापती बापटांनी म्हटले हाते आणि ते आजही आपण मिरवतो. पण कर्तृत्व, संवेदनशीलता आणि विवेक या तीनही आघाड्यांवर महाराष्ट्र मेला तर नाही ना, असा प्रश्न आपण स्वत:ला विचारला पाहिजे. गेल्या ५० वर्षांत आपण ज्ञाननिर्मिती केली का, विचारांच्या नव्या दिशा शोधल्या का, महाराष्ट्राच्या सामूहिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी निष्ठेने झटलो का, या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ही उत्तरं देण्यासाठी आपण जितका वेळ लावू तितका महाराष्ट्र दिन हा उपचार होऊन बसेल; तसा तो आताही उपचार झालेला आहेच!