शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Day: नर्तक ते निर्माता; रत्नकांत जगतापचा अभिमानास्पद प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 10:41 IST

जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर नेत्रदीपक यश

- अजय परचुरे

ही कहाणी आहे गिरणगावात लहानाचा मोठा झालेल्या आणि एका सामान्य गिरणी कामगाराच्या घरी जन्माला आलेल्या रत्नाकांत  दशरथ जगताप या अवलियाची. अनेक सिनेतारकांच्या मागे डान्सर म्हणून करिअर सुरू करणारा रत्नकांत बघता बघता याच मराठी चंदेरी दुनियेच्या अनेक सिनेमांचा कार्यकारी निर्माता बनला. मराठी माणसाने घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. पण यामागे होती प्रचंड जिद्द, चिकाटी आणि पडेल ते काम करण्याची तयारी. गिरणगावात जन्माला आल्यामुळे रत्नकांतमध्ये कलेचे गुण येण्यास फार काळ लागला नाही. पालिका शाळेत शिक्षण घेत असताना रत्नकांतचे पाय आपोआप नृत्याकडे वळले होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात रत्नकांतने याच पायावर आपलं पुढचं भविष्य घडवायचं हे मनाशी पक्कं केलं होतं. रत्नाकांतने आपलं महाविद्यालयीन शिक्षण आर. एम. भट ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केलं. या महाविद्यालयात असतानाच उत्कर्ष मंडळात रात्रीच्या अभ्यासिकेसाठी रत्नकांत अभ्यासाला जायचा. मात्र त्या ठिकाणी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रत्नकांतचे मन वेधून घेतलं होतं. आणि स्वत:मधला कलाकार शोधण्यासाठी कृष्णविवर, प्रेमाच्या गावे जावे या एकांकिकामधून रत्नकांतने काम केले. घरातल्यांनी मात्र त्याला आधी नोकरी कर, याकडे नंतर लक्ष दे, असा सल्ला दिला. पण रत्नकांतचे मामा त्याच्या पाठिशी उभे राहिले. घरच्यांचा विरोध थोडा कमी व्हावा म्हणून रत्नकांतने एका खासगी कंपनीत नोकरी केली. पण त्याचं मन मात्र तिकडे रमत नव्हतं. उत्कर्ष मंडळात तो कलाप्रमुख झाला होता. पण म्हणावं तसं काही घडत नव्हतं. अंगभूत असलेली नृत्याची कला त्याला खुणावत होती. त्याने थेट नृत्यालिकाच्या संचालिका किशु पाल यांना गाठले आणि आपल्या मनातील भावना बोलून दाखवली आणि इकडे रत्नकांतच्या आयुष्याला पहिली कलाटणी मिळाली. उत्कर्षच्या अनेक नृत्यनाटिंकामध्ये त्याने अभिनय आणि नृत्य केलं. आणि त्यामुळे तो थेट चंदेरी दुनियेत जाऊन पोहोचला .ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार यांनी त्याला बऱ्याच सिनेमांमध्ये नृत्य करण्याची संधी दिली. हे करत असतानाच सिनेमासृष्टीतील मॅनेजमेंटही तो हळूहळू शिकत होता. सिनेमातील गाण्याचे टेकिंग झाल्यावर कार्यकारी निर्मात्यांना मदत करणे, हिशोब ठेवणे, शूटींगला लागणारी सामुग्री उपलब्ध करून देणे, अशी सगळी कामं तो मेहनतीने आणि मनापासून करू लागला. यातूनच त्याला आपली एक यशस्वी दिशा सापडली. रत्नकांतच्या या मॅनेजमेंट स्कीलने रंगभूमीलाही प्रभावित केले. आणि एक उत्तम प्रकाशयोजनाकार ही रंगभूमीवरची त्याची नवीन ओळख बनली. याचबरोबर तो नाटकांच्या प्रयोगाला लागणाऱ्या लाईट्सची व्यवस्थाही पुरवायला लागला. ज्याच्यात पैसा ते करिअर हा मंत्र त्याला प्रकाशयोजनेतून कळला. स्वत:चे अत्याधुनिक लाईटसचे सामान त्याने मेहनतीने उभे केले आणि हाच त्याचा व्यवसाय बनला. रंगभूमीवरील २५ हून जास्त व्यावसायिक नाटकांना त्याने प्रकाशयोजनाची सामुग्री त्याच्या ओमकार आर्ट्स कंपनीतर्फे पुरवण्यात आली. यात व्यक्ती आणि वल्ली, गेला उडत, डोण्ट वरी बी हॅप्पी या हिट नाटकांचा समावेश आहे. नर्तक, व्यवस्थापक, प्रकाशयोजनाकार, सामुग्रीकार अशी मजल दरमजल तो करत होता. अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याचं व्यवस्थापनही रत्नकांत आणि त्याच्या टीमने लिलया पेललं. आता त्याला चंदेरी दुनिया खुणावू लागली आणि बदलेल्या मराठी सिनेमांची आव्हानं पेलण्यासाठी रत्नकांत अनेक मराठी हिट सिनेमांचा कार्यकारी निर्माता बनला, ज्यात केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, सुबोध भावे, अविनाश खर्शीकर अशा रथी महारथींच्या सर्व सिनेमांचा समावेश आहे. कट्यार काळजात घुसली या अजरामर सिनेमाला कार्यकारी निर्माता म्हणून रत्नकांतने केलेलं कामाचं कौतुक संपूर्ण मराठी इंडस्ट्रीने केलं. रत्नकांत इतक्यावरच थांबला नाही. आपण ज्या मुशीतून वर आलो त्या रंगमंच कामगारांना तो अजून विसरलेला नाही. रंगभूमीवरील रंगमंच कामगारांच्या न्यायासाठी त्याने रंगमंच कामगार संघटनेची मोट बांधली. ज्याचा तो अनेक वर्ष अध्यक्ष आहे. रंगमंच कामगारांना त्यांची हक्काची घरं उपलब्ध करून देण्यापासून ते त्यांना हककाचे पैसे मिळवून देण्याचे कार्य तो आजही करतोय. मराठी कलाकारासाठी, कामगारांसाठी सदैव लढणारा रत्नकांत जगताप मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच एक सच्चा रंगकर्मी आहे.  

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनMaharashtraमहाराष्ट्र