शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Maharashtra Day: नर्तक ते निर्माता; रत्नकांत जगतापचा अभिमानास्पद प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 10:41 IST

जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर नेत्रदीपक यश

- अजय परचुरे

ही कहाणी आहे गिरणगावात लहानाचा मोठा झालेल्या आणि एका सामान्य गिरणी कामगाराच्या घरी जन्माला आलेल्या रत्नाकांत  दशरथ जगताप या अवलियाची. अनेक सिनेतारकांच्या मागे डान्सर म्हणून करिअर सुरू करणारा रत्नकांत बघता बघता याच मराठी चंदेरी दुनियेच्या अनेक सिनेमांचा कार्यकारी निर्माता बनला. मराठी माणसाने घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे. पण यामागे होती प्रचंड जिद्द, चिकाटी आणि पडेल ते काम करण्याची तयारी. गिरणगावात जन्माला आल्यामुळे रत्नकांतमध्ये कलेचे गुण येण्यास फार काळ लागला नाही. पालिका शाळेत शिक्षण घेत असताना रत्नकांतचे पाय आपोआप नृत्याकडे वळले होते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात रत्नकांतने याच पायावर आपलं पुढचं भविष्य घडवायचं हे मनाशी पक्कं केलं होतं. रत्नाकांतने आपलं महाविद्यालयीन शिक्षण आर. एम. भट ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केलं. या महाविद्यालयात असतानाच उत्कर्ष मंडळात रात्रीच्या अभ्यासिकेसाठी रत्नकांत अभ्यासाला जायचा. मात्र त्या ठिकाणी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रत्नकांतचे मन वेधून घेतलं होतं. आणि स्वत:मधला कलाकार शोधण्यासाठी कृष्णविवर, प्रेमाच्या गावे जावे या एकांकिकामधून रत्नकांतने काम केले. घरातल्यांनी मात्र त्याला आधी नोकरी कर, याकडे नंतर लक्ष दे, असा सल्ला दिला. पण रत्नकांतचे मामा त्याच्या पाठिशी उभे राहिले. घरच्यांचा विरोध थोडा कमी व्हावा म्हणून रत्नकांतने एका खासगी कंपनीत नोकरी केली. पण त्याचं मन मात्र तिकडे रमत नव्हतं. उत्कर्ष मंडळात तो कलाप्रमुख झाला होता. पण म्हणावं तसं काही घडत नव्हतं. अंगभूत असलेली नृत्याची कला त्याला खुणावत होती. त्याने थेट नृत्यालिकाच्या संचालिका किशु पाल यांना गाठले आणि आपल्या मनातील भावना बोलून दाखवली आणि इकडे रत्नकांतच्या आयुष्याला पहिली कलाटणी मिळाली. उत्कर्षच्या अनेक नृत्यनाटिंकामध्ये त्याने अभिनय आणि नृत्य केलं. आणि त्यामुळे तो थेट चंदेरी दुनियेत जाऊन पोहोचला .ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार यांनी त्याला बऱ्याच सिनेमांमध्ये नृत्य करण्याची संधी दिली. हे करत असतानाच सिनेमासृष्टीतील मॅनेजमेंटही तो हळूहळू शिकत होता. सिनेमातील गाण्याचे टेकिंग झाल्यावर कार्यकारी निर्मात्यांना मदत करणे, हिशोब ठेवणे, शूटींगला लागणारी सामुग्री उपलब्ध करून देणे, अशी सगळी कामं तो मेहनतीने आणि मनापासून करू लागला. यातूनच त्याला आपली एक यशस्वी दिशा सापडली. रत्नकांतच्या या मॅनेजमेंट स्कीलने रंगभूमीलाही प्रभावित केले. आणि एक उत्तम प्रकाशयोजनाकार ही रंगभूमीवरची त्याची नवीन ओळख बनली. याचबरोबर तो नाटकांच्या प्रयोगाला लागणाऱ्या लाईट्सची व्यवस्थाही पुरवायला लागला. ज्याच्यात पैसा ते करिअर हा मंत्र त्याला प्रकाशयोजनेतून कळला. स्वत:चे अत्याधुनिक लाईटसचे सामान त्याने मेहनतीने उभे केले आणि हाच त्याचा व्यवसाय बनला. रंगभूमीवरील २५ हून जास्त व्यावसायिक नाटकांना त्याने प्रकाशयोजनाची सामुग्री त्याच्या ओमकार आर्ट्स कंपनीतर्फे पुरवण्यात आली. यात व्यक्ती आणि वल्ली, गेला उडत, डोण्ट वरी बी हॅप्पी या हिट नाटकांचा समावेश आहे. नर्तक, व्यवस्थापक, प्रकाशयोजनाकार, सामुग्रीकार अशी मजल दरमजल तो करत होता. अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याचं व्यवस्थापनही रत्नकांत आणि त्याच्या टीमने लिलया पेललं. आता त्याला चंदेरी दुनिया खुणावू लागली आणि बदलेल्या मराठी सिनेमांची आव्हानं पेलण्यासाठी रत्नकांत अनेक मराठी हिट सिनेमांचा कार्यकारी निर्माता बनला, ज्यात केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी, सुबोध भावे, अविनाश खर्शीकर अशा रथी महारथींच्या सर्व सिनेमांचा समावेश आहे. कट्यार काळजात घुसली या अजरामर सिनेमाला कार्यकारी निर्माता म्हणून रत्नकांतने केलेलं कामाचं कौतुक संपूर्ण मराठी इंडस्ट्रीने केलं. रत्नकांत इतक्यावरच थांबला नाही. आपण ज्या मुशीतून वर आलो त्या रंगमंच कामगारांना तो अजून विसरलेला नाही. रंगभूमीवरील रंगमंच कामगारांच्या न्यायासाठी त्याने रंगमंच कामगार संघटनेची मोट बांधली. ज्याचा तो अनेक वर्ष अध्यक्ष आहे. रंगमंच कामगारांना त्यांची हक्काची घरं उपलब्ध करून देण्यापासून ते त्यांना हककाचे पैसे मिळवून देण्याचे कार्य तो आजही करतोय. मराठी कलाकारासाठी, कामगारांसाठी सदैव लढणारा रत्नकांत जगताप मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच एक सच्चा रंगकर्मी आहे.  

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनMaharashtraमहाराष्ट्र