शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रातील सूर धमकीवजा; राज्यपाल कोश्यारींनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 06:07 IST

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आपण जी सुधारणा केली आहे ती मला प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि अनधिकृत वाटते.

मुंबई : ‘आपल्या पत्रातील असंतुलित आणि धमकीवजा सूर बघून मी खूपच दु:खी झालो. अशा पत्रामुळे राज्यपालांच्या उच्चतम संवैधानिक कार्यालयाची प्रतिमा खालावली गेली, तिचे अध:पतन झाले,’ या शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे संमती मागितली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे तीन ज्येष्ठ मंत्री राज्यपालांना गेल्या रविवारी जाऊन भेटले आणि त्यांनीही साकडे घातले. त्यावर कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मी निर्णय देईन, असे राज्यपाल म्हणाल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले होते.

राज्य सरकारने सोमवारी सकाळी राज्यपालांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले. सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी खरमरीत पत्र पाठविले. ‘राज्यपालांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये. विधानमंडळाने केलेले कायदे तपासण्याचा अधिकार आपल्याला नाही,’ असे ठाकरे यांनी पत्रात सुनावले होते. याच पत्राचा संदर्भ देत राज्यपालांनी मंगळवारी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात ही नाराजी बोलून दाखविली.

राज्यपालांनी पत्रात असेही म्हटले आहे की, मी घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आपण जी सुधारणा केली आहे ती मला प्रथमदर्शनी घटनाबाह्य आणि अनधिकृत वाटते. अध्यक्ष निवडीबाबतची प्रक्रिया ठरवायला तुम्ही ११ महिने घेतले आणि नियम आमूलाग्र बदलले. याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कायदेशीर अभ्यास करणे गरजेचे आहे. संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही.

राज्य सरकारदेखील राज्यपालांवर नाराज- राज्य सरकार पण राज्यपालांवर नाराज आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबद्दलचा संघर्ष कालही टोकाला जावू शकला असता, पण राज्य सरकारने संयम बाळगला. - राज्यपाल जेव्हा राजी होतील आणि अनुमती देतील तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे