शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maharashtra CM : अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळेंचे नाव पुढे येणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 12:11 IST

अजित पवार राज्यात असताना सुप्रिया यांना राज्याच्या राजकारणात आणणे सोयीस्कर नव्हते. मात्र आता अजित पवार यांची हकालपट्टी होणार हे निश्चित मानले जात आहे.

मुंबई - राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज उलथापालथ घडवणाऱ्या घटना घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राजकीय भूकंप झाला असून भाजपला सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. मात्र शरद पवार यांच्या भूमिकेमुळे अजित पवारांचा मार्ग खडतर दिसत असून सुप्रिया सुळे आता राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

अजित पवार यांनी आज भल्या पहाटे, भाजपच्या साथीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांच्या पाठिशी शरद पवार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर सुप्रिया सुळे यांना भावना अनावर झाल्या आहेत. तसेच पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याचे त्यांनी मान्य केले. तर प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले की, अजित पवारांसोबत असलेले आमदार शरद पवारांना भेटायला येणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या मागे आमदार किती असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण यावर अद्याप एकमत होऊ शकले नव्हते. केवळ उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत होते. मात्र आता राज्यातील स्थिती बदलली आहे. अशा स्थितीत शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंना राज्यात पाचारण करण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. अजित पवार राज्यात असताना सुप्रिया यांना राज्याच्या राजकारणात आणणे सोयीस्कर नव्हते. मात्र आता अजित पवार यांची हकालपट्टी होणार हे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादीचे राज्यातील नेतृत्व येणार किंबहुना सुप्रिया यांच्या रुपाने राज्याला महिला मुख्यमंत्रीही मिळू शकेल, असंही बोललं जात आहे.