शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget Session: फडणवीस मुख्यमंत्री असताना तपास झाला असता तर...; मलिकांच्या अटकेवरून गृहमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:48 IST

Maharashtra Budget Session: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, मंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक यावर पाटील यांनी भाष्य केलं. विधानसभेत सातत्यानं पेन ड्राईव्ह आणणाऱ्या फडणवीस यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केला का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. 

राज्य सरकार विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप फडणवीसांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यांच्या आरोपांना वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. नवाब मलिक पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात ते आवाज उठत असतील म्हणून त्यांचं तोंड बंद करायचं हे योग्य नाही, असं वळसे-पाटील म्हणाले.

मलिक यांना अडचणीत आणण्यासाठी जुनं प्रकरण उकरून काढण्यात आलं. मलिक यांच्यावर आरोप करण्यात आले ते प्रकरण अतिशय जुनं आहे. फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री होते. त्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदही त्यांच्याकडेच होतं. त्यावेळी फडणवीसांनी मलिक यांच्या जमीन खरेदीची चौकशी केली असती, तर बरं झालं असतं, असा खोचक टोला गृहमंत्र्यांनी लगावला.

यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मग देशभरात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरूय त्याला काय म्हणायचं, असा प्रश्न वळसे पाटील यांनी केला. गिरीश महाजन यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप फडणवीसांनी केला. घटना पुण्यात घडली असताना तपास दुसरीकडे वर्ग केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू मुंबईत झाला. पण एफआयएर बिहारमध्ये नोंदवला गेला. मग ते प्रकरण सीबीआयनं आपल्या हाती घेतलं, याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधलं. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस