शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Maharashtra Budget Session: फडणवीस मुख्यमंत्री असताना तपास झाला असता तर...; मलिकांच्या अटकेवरून गृहमंत्र्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 18:48 IST

Maharashtra Budget Session: देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, मंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक यावर पाटील यांनी भाष्य केलं. विधानसभेत सातत्यानं पेन ड्राईव्ह आणणाऱ्या फडणवीस यांनी डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केला का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. 

राज्य सरकार विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप फडणवीसांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यांच्या आरोपांना वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. नवाब मलिक पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात ते आवाज उठत असतील म्हणून त्यांचं तोंड बंद करायचं हे योग्य नाही, असं वळसे-पाटील म्हणाले.

मलिक यांना अडचणीत आणण्यासाठी जुनं प्रकरण उकरून काढण्यात आलं. मलिक यांच्यावर आरोप करण्यात आले ते प्रकरण अतिशय जुनं आहे. फडणवीस ५ वर्षे मुख्यमंत्री होते. त्या सरकारमध्ये गृहमंत्रिपदही त्यांच्याकडेच होतं. त्यावेळी फडणवीसांनी मलिक यांच्या जमीन खरेदीची चौकशी केली असती, तर बरं झालं असतं, असा खोचक टोला गृहमंत्र्यांनी लगावला.

यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. मग देशभरात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरूय त्याला काय म्हणायचं, असा प्रश्न वळसे पाटील यांनी केला. गिरीश महाजन यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप फडणवीसांनी केला. घटना पुण्यात घडली असताना तपास दुसरीकडे वर्ग केल्याचं फडणवीसांनी सांगितलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू मुंबईत झाला. पण एफआयएर बिहारमध्ये नोंदवला गेला. मग ते प्रकरण सीबीआयनं आपल्या हाती घेतलं, याकडे गृहमंत्र्यांनी लक्ष वेधलं. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस