शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

विधान परिषदेत पहिल्याच दिवशी राडा; दानवे संतापले, CM फडणवीसही जागेवरून उठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:38 IST

शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी बोलण्याची परवानगी मागितली आहे असं अंबादास दानवे यांनी सभागृहात म्हटलं.

मुंबई - राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं. यावेळी विधान परिषदेत विरोधकांनी पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे मांडला. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

सभागृह सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते दानवे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा उचलून धरला. त्यावेळी शोक प्रस्ताव मांडायचा आहे असं सभापतींनी म्हटलं. विधानसभेच्या सदस्याबाबत हा विषय असून तो खालच्या सभागृहात मांडला जाईल. आपल्याला बोलायचे असेल तर उद्या बोला असं सभापतींनी सांगितले. त्यावर विरोधकांनी गोंधळ घातला. त्याचवेळी अंबादास दानवे म्हणाले की, एका मंत्र्‍याला शिक्षा झाली आहे. कोर्टाने दोषी ठरवलं असून २ वर्षाची ही शिक्षा आहे. आतापर्यंत या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही त्यावर सरकारची भूमिका काय हे सांगावे अशी मागणी केली. 

तसेच शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी बोलण्याची परवानगी मागितली आहे. एका मंत्र्‍याला शिक्षा झालीय असं दानवे म्हणाले त्यावर सभापती राम शिंदे यांनी उठून तुम्ही जो मुद्दा मांडताय ते सदस्य खालच्या सभागृहातील आहेत. तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर आपल्याला हा विषय दुसऱ्या नियमाने मांडता येईल असं त्यांनी म्हटलं. त्यावर विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यातला मंत्री दोन्ही सभागृहाचा असतो, त्यावर सरकारची भूमिका मांडली पाहिजे. मंत्री राज्याचा आहे. त्यावर बोललं गेले पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. या मुद्द्यावरून विधान परिषदेत गोंधळ झाला.

गोंधळ होताच मुख्यमंत्री उठले अन् म्हणाले...

विरोधकांकडून सुरू असलेला गोंधळ पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागेवर उठत म्हणाले, देशाचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचा शोक प्रस्ताव आहे. या प्रस्तावावेळी असा गोंधळ होईल वाटलं नव्हते. तथापि, विरोधी पक्षनेत्यांना एवढेच सांगतो, आपण मंत्र्‍यांबाबत जे मांडत आहात त्यासंदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केली आहे. कोर्टाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेAmbadas Danweyअंबादास दानवेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRam Shindeराम शिंदे