शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सिंचन प्रकल्पांना चालना अन् पूरनियंत्रणासाठीही भरीव तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 07:03 IST

Maharashtra Budget 2026: नदीजोड प्रकल्पांद्वारे दुष्काळग्रस्त भागाला दिलासा; जलसंपत्तीची अचूक आणि डिजिटल माहिती उपलब्ध  होण्यासाठी नाशिकला जल माहिती केंद्राची स्थापना, शहरांमधील पाणीपुरवठ्यासाठी मोठी तरतूद  

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील पाणीटंचाई, दुष्काळ आणि पूरस्थितीचा दीर्घकालीन विचार करून सिंचन व जलव्यवस्थापन क्षेत्रात अनेक मोठ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्या आहेत. २०४७ पर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन ५५ लिटर आणि शहरी भागात दरडोई १३५ लिटर पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

राज्यातील जलसंपत्तीची अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिक येथे ‘राज्य जल माहिती केंद्र’ स्थापन करण्यात येणार असून यासाठी ७१.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील जलस्रोतांची डिजिटल, प्रमाणित आणि ऑनलाइन माहिती उपलब्ध होणार आहे.

पूरनियंत्रणासाठी २,२४० कोटींचा प्रकल्पपश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी जागतिक बँकेच्या मदतीने २,२४० कोटी रुपयांचा पूरनियंत्रण प्रकल्प राबविण्यात येणार आहे.या प्रकल्पांतर्गत कृष्णा खोऱ्यातील पुराचे अतिरिक्त पाणी भीमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याची योजना आहे. 

मुंबईजवळचे पाणी गोदावरीततसेच वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.

पिण्यासाठी पाणी राखून ठेवणार२०२६ मध्ये एल-निनोचा मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा साठा राखून ठेवला जाणार आहे. बारामती आणि पुरंदर तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी निरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 

शहरांसाठी ५,८६० कोटींचा जलप्रकल्पशहरांमधील पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने ५,८६० कोटी रुपयांचा ‘महाराष्ट्र नागरी जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्प’ राबविण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Boosts Irrigation Projects, Allocates Funds for Flood Control Measures

Web Summary : Maharashtra government announces major irrigation schemes, aiming for water security by 2047. Projects include a state water information center, flood control in western Maharashtra, water diversion from Mumbai, and urban water supply improvements. The focus is on long-term solutions for water scarcity and flood management.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026