शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Budget 2022: ‘स्वराज्या’साठी अजित पवारांची मोठी घोषणा; छ. संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:05 IST

विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचं पाऊल आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

मुंबई – राज्याचा आगामी २०२२-२३ या वर्षीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला. यापूर्वी विधानभवनात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर सभागृहात अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात करताना अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी शासनाकडून २५० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली आहे. पुढील वर्षात छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार देण्यात येतील असंही सांगितले आहे.(Maharashtra Budget Speech Updates)

अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात वढु बुद्रुक इथं उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकार २५० कोटींचा निधी उपलब्ध करून देईल. आगामी काळात असामान्य शौर्य, धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी येत्या वर्षापासून महाराजांच्या नावानं छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करण्यात येईल असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं विविध निधी उपलब्ध केला आहे. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि परिसर विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राजगड, तोरणा, शिवनेरी, विजयदुर्ग किल्ल्यासाठी १४ कोटी तर मुंबईतील शिवडी आणि सेंट जॉर्जच्या विकासासाठी ७ कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा, युद्धनीती यासाठी यूनेस्कोकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई

दिला शब्द राज्याला की, धैर्याने जिंकू लढाई

लढाई लढताना विजयाची जागवली आशा

देशाने पाहिले अवघ्या आम्ही योग्य दाखवली दिशा

अशा शायरीच्या अंदाजात अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाची दिशा मांडली. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याच्या विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला. विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचं पाऊल आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प जनतेसाठी विकास करणारा आणि त्याला आधार देणारा आहे. जनता सुद्धा या अर्थसंकल्पाचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२Ajit Pawarअजित पवार