शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचा मृत्यू कशामुळे? शवविच्छेदन अहवाल आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 14:34 IST

Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या १४ श्रीसदस्यांच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे.

Maharashtra Bhushan Award: खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. तर, अद्यापही सात जणांवर तीन रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला या घटनेमुळे गालबोट लागले. यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मात्र, यातच आता १४ श्रीसदस्यांच्या मृत्यूबाबत शवविच्छेदन अहवाल समोर आल्याचे सांगितले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दुपारच्या सुमारास पार पडला होता. तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सियस असल्याने अनेकांना उष्माघाताची समस्या जाणवली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील १४ जणांचा मृत्यू झाला होता. आता १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. 

शवविच्छेदन अहवालात नेमके काय म्हटलेय?

वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, १४ जणांचा मृत्यू उष्माघातामुळेच झाला आहे. या १४ पैकी १२ जणांचा शवविच्छेदन पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते. तर, दोघांचे शवविच्छेदन अन्य रुग्णालयात करण्यात आले. यातील दोन मृतांना इतर व्याधींनी ग्रासलं होतं, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने म्हटले आहे. १४ मृतांमध्ये १० महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. १६ एप्रिल रोजी रात्री उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर, सोमवारी १७ एप्रिल रोजी दोन जणांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांनी दिली आहे. 

श्रीसदस्य ६ ते ७ तास होते उपाशी?

रिपोर्टनुसार मृत्यू झालेले श्री सदस्यांची पोटे रिकामी होती. मृत्यू होण्याआधी त्यांनी ६ ते ७ तासांपासून काही खाल्लेल नव्हते. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या जास्त वेळ संपर्कात राहिल्याने त्यांच्या शरीरात पाण्याची नसल्याचे दिसून आले. त्यापैकी काही श्री सदस्यांना सहव्याधी होत्या. त्यांनी अनेक तासांपासून काहीच अन्न खाल्लेल नव्हते. त्याचबरोबर त्यांनी पुरेसे पाणीही प्राशन केलेले नव्हते. अशात ते ४० अंश सेल्सिअस तापमान असताना उन्हात होते. हायपरटेन्शन किंवा ह्रदयाचा त्रास असलेल्या व्यक्तीला मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो, हे समजून सांगताना डॉक्टरांनी माहिती दिली की, मृतांपैकी एका व्यक्तीला ह्रदयविकाराचा त्रास होता. त्याबरोबर मधुमेह आणि हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तींची प्रकृतीही अशा वातावरणात पटकन बिघडते. सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी दीर्घकाळ उन्हाच्या संपर्कात राहायचं असल्यास थोड्या थोड्या अंतराने काहीतरी खाल्ले पाहिजे आणि पाणी प्यायला हवे. जे लोक चार ते पाच तास उन्हात बसलेले आहेत, केवळ पाणी पिल्याने त्यांना उष्माघाताचा त्रास टाळता येत नाही. शेडमुळे अशी घटना टाळता येऊ शकते, असेही डॉक्टरांनी सांगितले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

दरम्यान, विरोधकांकडून टीका झाल्यानंतर सरकारने बॅकफूटवर जात एक मोठा निर्णय घेतला आहे. भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई