शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Winter Season: राज्यपालांच्या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:12 IST

Maharashtra Assembly Speaker Election: राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई - रिक्त असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांसाठी अवलंबण्यात आलेल्या निवड प्रक्रियेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक नियोजित होती. मतांची संभाव्य फूट टाळण्यासाठी अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने व्हावी, असा कायद्यात बदलही करण्यात आला. मात्र राज्यपालांनी या अध्यक्षीय निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने पेच निर्माण झाला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांच्या परवानगीविना अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडण्यास विरोध केला, त्यानंतर ही निवडणूक न घेण्याचा निर्णय झाला.

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना एक खरमरीत पत्र पाठवले होते. तसेच अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम भूमिकेत होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा एक बंद लिफाफ्यामधून पत्र पाठवलं. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही याविषयी चर्चा झाली, अखेरीस ही निवडणूक टाळण्याबाबत अंतिम निर्णय झाला.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीvidhan sabhaविधानसभा