शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
4
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
5
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
6
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
7
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
8
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
9
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
10
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
11
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
12
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
13
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
14
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
15
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
16
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
17
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
18
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
19
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
20
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का

Maharashtra Assembly Winter Season: राज्यपालांच्या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:12 IST

Maharashtra Assembly Speaker Election: राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई - रिक्त असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांसाठी अवलंबण्यात आलेल्या निवड प्रक्रियेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक नियोजित होती. मतांची संभाव्य फूट टाळण्यासाठी अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने व्हावी, असा कायद्यात बदलही करण्यात आला. मात्र राज्यपालांनी या अध्यक्षीय निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने पेच निर्माण झाला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांच्या परवानगीविना अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडण्यास विरोध केला, त्यानंतर ही निवडणूक न घेण्याचा निर्णय झाला.

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना एक खरमरीत पत्र पाठवले होते. तसेच अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम भूमिकेत होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा एक बंद लिफाफ्यामधून पत्र पाठवलं. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही याविषयी चर्चा झाली, अखेरीस ही निवडणूक टाळण्याबाबत अंतिम निर्णय झाला.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीvidhan sabhaविधानसभा