शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

Maharashtra Assembly Winter Season: राज्यपालांच्या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:12 IST

Maharashtra Assembly Speaker Election: राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई - रिक्त असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांसाठी अवलंबण्यात आलेल्या निवड प्रक्रियेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक नियोजित होती. मतांची संभाव्य फूट टाळण्यासाठी अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने व्हावी, असा कायद्यात बदलही करण्यात आला. मात्र राज्यपालांनी या अध्यक्षीय निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने पेच निर्माण झाला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांच्या परवानगीविना अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडण्यास विरोध केला, त्यानंतर ही निवडणूक न घेण्याचा निर्णय झाला.

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना एक खरमरीत पत्र पाठवले होते. तसेच अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम भूमिकेत होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा एक बंद लिफाफ्यामधून पत्र पाठवलं. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही याविषयी चर्चा झाली, अखेरीस ही निवडणूक टाळण्याबाबत अंतिम निर्णय झाला.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीvidhan sabhaविधानसभा