शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Maharashtra Assembly Winter Season: राज्यपालांच्या आक्षेपानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:12 IST

Maharashtra Assembly Speaker Election: राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई - रिक्त असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर पडण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांसाठी अवलंबण्यात आलेल्या निवड प्रक्रियेवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशाविना निवडणूक घेतल्यास त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक नियोजित होती. मतांची संभाव्य फूट टाळण्यासाठी अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने व्हावी, असा कायद्यात बदलही करण्यात आला. मात्र राज्यपालांनी या अध्यक्षीय निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने पेच निर्माण झाला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांच्या परवानगीविना अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडण्यास विरोध केला, त्यानंतर ही निवडणूक न घेण्याचा निर्णय झाला.

राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना एक खरमरीत पत्र पाठवले होते. तसेच अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम भूमिकेत होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा एक बंद लिफाफ्यामधून पत्र पाठवलं. तसेच महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही याविषयी चर्चा झाली, अखेरीस ही निवडणूक टाळण्याबाबत अंतिम निर्णय झाला.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीvidhan sabhaविधानसभा