शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:00 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. लोकसभेला ज्याप्रमाणे स्थिती होती, त्यावरून महाविकास आघाडीला चांगला जनाधार मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. शिवाय मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, सगळ्या शक्यतांना छेद देत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला न भूतो, न भविष्यती, असे यश दिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही, असेच चित्र आहे. 

या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल १३२ जागा जिंकल्या. तर शिवसेना शिंदे गटाने ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळवता आला. यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. याबाबत महायुतीचे बैठकांचे सत्र सुरू आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असे वाटते? 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असे वाटते, असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे? आमच्या वाट्याला नेहमी संकटच आले आहेत. ७०-७५ वर्षांत आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे. आमची जात आणि आमचे लेकरे मोठे करण्यासाठी आम्हाला लढावे लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भले होईल, असे आम्ही कधीही अपेक्षित धरले नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आले काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावे लागणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पहिल्यांदा तेच होते आणि आताही तेच आहे. आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आम्हाला लढावेच लागणार, हे पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे. आम्हाला काही वाटत नाही. कोणीही मुख्यमंत्री झाले काय? नाही झाले काय? त्याचे आम्हाला कुठलेही सोयर सुतक नाही. आम्ही आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधी झाले नसेल असे मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आता राजकारणाचा विषय संपला आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस