शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट!
2
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
3
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
4
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
5
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
6
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
7
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
8
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
9
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
10
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
11
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
12
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
13
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
14
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
15
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
16
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
17
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
18
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
19
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
20
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:00 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. लोकसभेला ज्याप्रमाणे स्थिती होती, त्यावरून महाविकास आघाडीला चांगला जनाधार मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. शिवाय मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, सगळ्या शक्यतांना छेद देत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला न भूतो, न भविष्यती, असे यश दिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही, असेच चित्र आहे. 

या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तब्बल १३२ जागा जिंकल्या. तर शिवसेना शिंदे गटाने ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळवता आला. यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. याबाबत महायुतीचे बैठकांचे सत्र सुरू आहे. लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असे वाटते? 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत, असे वाटते, असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, आमच्यासाठी कोण समाधानकारक आहे? आमच्या वाट्याला नेहमी संकटच आले आहेत. ७०-७५ वर्षांत आमच्या वाट्याला संघर्ष आला आहे, कोणीही आला काय त्याचे आम्हाला सुख किंवा दुःख असण्याचे काही कारण नाही. आमच्या जीवनात संघर्ष आहे आणि तो आम्हाला करावाच लागणार आहे. आमची जात आणि आमचे लेकरे मोठे करण्यासाठी आम्हाला लढावे लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भले होईल, असे आम्ही कधीही अपेक्षित धरले नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आले काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावे लागणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पहिल्यांदा तेच होते आणि आताही तेच आहे. आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आम्हाला लढावेच लागणार, हे पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे. आम्हाला काही वाटत नाही. कोणीही मुख्यमंत्री झाले काय? नाही झाले काय? त्याचे आम्हाला कुठलेही सोयर सुतक नाही. आम्ही आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधी झाले नसेल असे मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आता राजकारणाचा विषय संपला आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस