शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:14 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राजरत्न आंबेडकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे काही प्रश्न निर्माण झाले असून, निवडणुकीतून माघार घेण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्यावर दबाव होता का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आम्ही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीत उमेदवार द्यायचा नाही. आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. परंतु, राजरत्न आंबेडकर यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली असल्याचे सांगितले जात आहे. 

मीडियाशी बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले की, निवडणूक लढवायची की नाही, हा निर्णय मनोज जरांगे यांचा आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा आदर करतो. मराठा समाजाच्या मनात कोणताही भ्रम राहू नये किंवा त्यांच्या मनात कोणता द्वेष निर्माण होऊ नये, म्हणून हे स्पष्टीकरण देत आहे. उमेदवारांची यादी न मिळणे हे निवडणूक न लढवण्याचे कारण नाही, असे राजरत्न आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

उमेदवारांची यादी अगोदरच दिलेली होती

दलित, मराठा आणि मुस्लीम यांच्यातील युती हे समीकरण  गावागावांत जाऊन पोहोचलेले आहे. याला धक्का लागू नये यासाठी हे स्पष्टीकरण देत आहे. मला मराठा समाजातून अनेक फोन कॉल्स येत आहेत. तुम्ही उमेदवारांची यादी का दिली नाही? अशी विचारणा केली जात आहे. दलित आणि मुस्लीम नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडे दिलेली नाही. त्यामुळेच आम्ही निवडणूक लढवत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मात्र हे कारण नाही. एकमेकांना एकमेकांचे उमेदवार अगोदरपासूनच माहिती होते. उमेदवारांच्या यादीची देवाणघेवाण अगोदरच झालेली होती. कोणकोणत्या जागांवर उमेदवार बदलायला हवे होते, यावरही चर्चा झाली होती. मुस्लीम, बौद्ध, दलित समाजाच्या उमेदवारांची यादी अगोदरच दिलेली होती, असे राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचे जे कारण दिले, त्यामुळे मराठा, दलित, बौद्ध, मुस्लीस समाजात एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक लढवणे हा आमचा उद्देश नाही. आमच्यासाठी समाजातील एकता महत्त्वाची आहे. मनोज जरांगे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? याबाबत मला माहिती नाही, असेही राजरत्न आंबेडकर यांनी नमूद केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील