शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:14 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राजरत्न आंबेडकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे काही प्रश्न निर्माण झाले असून, निवडणुकीतून माघार घेण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्यावर दबाव होता का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आम्ही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीत उमेदवार द्यायचा नाही. आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. परंतु, राजरत्न आंबेडकर यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली असल्याचे सांगितले जात आहे. 

मीडियाशी बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले की, निवडणूक लढवायची की नाही, हा निर्णय मनोज जरांगे यांचा आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा आदर करतो. मराठा समाजाच्या मनात कोणताही भ्रम राहू नये किंवा त्यांच्या मनात कोणता द्वेष निर्माण होऊ नये, म्हणून हे स्पष्टीकरण देत आहे. उमेदवारांची यादी न मिळणे हे निवडणूक न लढवण्याचे कारण नाही, असे राजरत्न आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

उमेदवारांची यादी अगोदरच दिलेली होती

दलित, मराठा आणि मुस्लीम यांच्यातील युती हे समीकरण  गावागावांत जाऊन पोहोचलेले आहे. याला धक्का लागू नये यासाठी हे स्पष्टीकरण देत आहे. मला मराठा समाजातून अनेक फोन कॉल्स येत आहेत. तुम्ही उमेदवारांची यादी का दिली नाही? अशी विचारणा केली जात आहे. दलित आणि मुस्लीम नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडे दिलेली नाही. त्यामुळेच आम्ही निवडणूक लढवत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मात्र हे कारण नाही. एकमेकांना एकमेकांचे उमेदवार अगोदरपासूनच माहिती होते. उमेदवारांच्या यादीची देवाणघेवाण अगोदरच झालेली होती. कोणकोणत्या जागांवर उमेदवार बदलायला हवे होते, यावरही चर्चा झाली होती. मुस्लीम, बौद्ध, दलित समाजाच्या उमेदवारांची यादी अगोदरच दिलेली होती, असे राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचे जे कारण दिले, त्यामुळे मराठा, दलित, बौद्ध, मुस्लीस समाजात एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक लढवणे हा आमचा उद्देश नाही. आमच्यासाठी समाजातील एकता महत्त्वाची आहे. मनोज जरांगे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? याबाबत मला माहिती नाही, असेही राजरत्न आंबेडकर यांनी नमूद केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील