शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:39 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: प्रामाणिक सांगतो की, त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी सूचना मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. लातूर येथील सभेत राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना काही प्रश्न करत टीका केली. या टीकेचा खरपूस शब्दांत मनोज जरांगे यांनी समाचार घेतला.

सर्व राजकीय पक्ष तुम्हाला झुलवत ठेवत आहेत. ते तुमच्याकडे आले तर त्यांना विचारा की आरक्षण कसे देणार हे आधी सांगा. जिल्ह्याजिल्ह्यांत मोर्चे निघाले होते, त्या मोर्च्यांचे काय झाले? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळाले? आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात आता निवडणुका लढवू. नंतर म्हणतात आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार. तुम्हाला लढवायच्या तर लढवा. पाडायच्या तर पाडा. प्रश्न एवढाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, या गोष्टी तुमच्याशी अत्यंत विचारपूर्वक बोलतोय. मी सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडतोय. हीच सत्य परिस्थिती मी ज्यावेळी जरांगे पाटलांना भेटायला गेलो, त्यावेळी मी त्यांच्यासमोर मांडली होती, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यावर मनोज जरांगे यांनी पलटवार केला. 

तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे हे माहिती आहे

आरक्षण कसे देणार माझ्या सामाजाला माहिती आहे, ते तुम्हाला कळणार नाही. आरक्षण काय आणि लढा टिकवणे काय असते तुम्हाला काय माहिती? तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे हे माहिती आहे. पण अस्तित्व कसे टिकवायचे हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी त्या भानगडीत पडू नये, त्यांना मानणारा आमचा एक वर्ग आहे. प्रामाणिक सांगतो की, त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी माझी त्यांना सूचना आहे. आरक्षण कसे मिळते, ते मला माहिती आहे, ते तुम्हाला माहिती नाही, तुम्ही त्या वेळी झोपेत होते का, मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी समाज एकसंध ठेवला. त्यांच्यासारखे पक्ष काढून समाजाला तात्पुरता आनंद द्यायचा नव्हता. त्यांना हे सगळे बोलायचा ठेका देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. 

दरम्यान, हे होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला माहिती आहे. जे तुम्हाला येऊन सांगताहेत ना की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. आले की पहिल्यांदा विचारा कसे? मागे मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले जा, दिले आरक्षण! म्हणजे काय? तुमच्या हातात तरी आहे का ते? हे राज्य सरकार देऊ तरी शकते का? कोणतेही राज्य सरकार देऊ शकते का? तामिळनाडूत असा प्रकार झाला. तामिळनाडू सरकारने सांगितले आरक्षण दिले. तो विषय सर्वोच्च न्यायालयात पडलेला आहे. त्याचा काहीही निकाल लागलेला नाही. जी गोष्ट घडू शकत नाही. जी गोष्ट होऊ शकत नाही, त्यावर आपण भांडतो आहोत, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील