शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 23:31 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: धर्मयुद्ध आणि व्होट जिहादवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. धर्मयुद्ध आणि व्होट जिहादवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा मुकाबला करण्यासाठी व्होट धर्म युद्धाने करू असे म्हटले होते. महायुती सरकारविरोधात सज्जाद नोमानी यांनी व्होट जिहादचे आवाहन केले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फक्त महाराष्ट्रच नाही तर केंद्रातील सरकारही अस्थिर करण्याबाबत नोमानी यांनी व्हिडीओत भाष्य केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

हिंदू समाजाने न घाबरता याचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला केला पाहिजे

प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, दोन राजकीय पक्षांच्या लढाईला धर्मयुद्ध म्हणणे चुकीचे ठरेल. तसेच राजकीय लढतींना व्होट जिहाद म्हणणे चुकीचे ठरेल. कुणाला मतदान करावे, हे सांगण्यासाठी पूर्वी धार्मिक स्थळावरून पत्रक काढले जात होते. पण आता व्होट जिहादसारख्या घोषणा खुलेआम होत आहेत. हिंदू समाजाने न घाबरता याचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला केला पाहीजे. खरा हिंदू हा मानवतेचा पाईक असतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत सर्वांशी समान व्यवहार केला पाहिजे. तसेच अन्यायही कधीच सहन करू नये, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.

दरम्यान, मी हे निश्चित सांगू शकतो की, महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जर इथे हरियाणाप्रमाणेच त्यांचा विजय झाला तर त्यांचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल. त्यानंतर दिल्ली सरकार नव्या आत्मविश्वासाने आपल्या वाईट हेतूंच्या दिशेने मार्गक्रमण करेल. जर महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला, दिल्लीमधील त्यांचे सरकार अधिक काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्राचे सरकार नाही, तर दिल्लीही आहे, असे सज्जाद नोमानी यांनी एका व्हिडिओत म्हणत भाजपा विरोधात मतदानाचे आवाहन केले होते.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण