शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

मित्राचा झाला शत्रू, शत्रूचा झाला मित्र; आमदारकी आपल्याच घरात हेच सूत्र

By संतोष भिसे | Updated: October 28, 2024 18:26 IST

राष्ट्रवादी, शिवसेनेच्या फुटीनंतर कार्यकर्ते आमनेसामने

संतोष भिसेसांगली : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्याच्या खटपटीत मित्राचे शत्रू झालेत, तर शत्रूचे मित्र झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेचे तिकीट मिळवायचेच आणि आमदारकी घरात आणायचीच या हेतूने वर्षानुवर्षाच्या स्नेहबंधांवर राजकारण्यांनी पाणी सोडल्याचे दिसून येत आहे.मिरज, विटा, इस्लामपूर, जत, आटपाडी आदी मतदारसंघांत तिकिटासाठी टोकाचा संघर्ष उद्भवला आहे. त्यातूनच कोणताही विधीनिषेध न ठेवता उमेदवारीसाठी वाट्टेल ते करण्यापर्यंत नेत्यांची मजल गेली आहे. मिरजेत गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ भाजपसाठी काम करणाऱ्या प्रा. मोहन वनखंडे यांनी अवघ्या वर्षभरात वेगळी चूल मांडली. २००९ पासून ते सुरेश खाडे यांचे सच्चे सहकारी होते; पण गेल्या वर्षभरापासून त्यांनी जनसुराज्यसोबत जवळीक केली. शेवटच्या टप्प्यात तर थेट काँग्रेसचा हात हातात घेतला; पण महाविकास आघाडीच्या जागावाटपात मिरजेची जागा उद्धवसेनेला सुटली. त्यामुळे आता त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. भाजपमधील मित्र आणि सहकारी दुरावले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विट्यामध्ये वैभव पाटील अजित पवार गटात गेले. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली; पण निवडणुकीत उमेदवारीसाठी त्यांनी ऐनवेळेस विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे सर्वेसर्वा शरद पवार यांची सांगलीत भेट घेतली. या टोकाच्या घडामोडीनंतरही रविवारपर्यंत त्यांची उमेदवारी अनिश्चितच होती.सांगलीत सुधीर गाडगीळ यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करताच भाजपमध्येच इच्छुकांची गर्दी झाली. पृथ्वीराज पवार, शेखर इनामदार, शिवाजी डोंगरे यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. पवार यांनी कार्यकर्त्यांच्या स्तरावर जोरदार तयारी केली, तर इनामदार यांच्या मुंबईला फेऱ्या वाढल्या; पण भाजपने ऐनवेळेस गाडगीळ यांनाच पुन्हा संधी दिल्याने इनामदार यांचा भ्रमनिरास झाला. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना यावे लागले. खुद्द गाडगीळ यांनीही उमेदवारी दाखल करण्यापूर्वी इनामदार यांच्या कार्यालयात जाऊन गळाभेट घेतली.तासगावमध्ये कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष केलेल्या संजय पाटील यांनी उमेदवारीसाठी त्यांचाच मैत्रीचा हात स्वीकारला. थेट पक्षप्रवेशही केला. आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अनेक वर्षांच्या भाजपसोबच्या घरोब्यानंतर शरद यांच्याशी जवळिकीचा प्रयत्न केला.

जत, तासगाव- कवठेमहांकाळमध्ये टोकाचा संघर्षगोपीचंद पडळकर आणि विलासराव जगताप हे एकाच पक्षाचे सदस्य; पण सध्याच्या निवडणुकीत त्यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. पडळकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा प्रचार करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे कधीकाळचे सहकारी आता राजकीय शत्रू झाले आहेत. कवठेमहांकाळमध्ये अगदी अलीकडे म्हणजे लोकसभेला परस्परांना आव्हान-प्रतिआव्हान देणारे संजय पाटील आणि अजितराव घोरपडे यांनी विधानसभेला मात्र गळ्यात गळे घातले आहेत.

राष्ट्रवादी, शिवसेनेच्या फुटीनंतर कार्यकर्ते आमनेसामनेराष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांच्या फुटीनंतर कार्यकर्तेही दुभंगले. वर्ष-दीड वर्षांपूर्वीपर्यंत पक्षादेश शिरसावंद्य मानून काम करणारे कार्यकर्ते आता निवडणुकीत मात्र परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीPoliticsराजकारणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024