शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 19:30 IST

शरद पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचे सांगितले.

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही यंदा विविध घोषणांमुळे चर्चेची ठरली आहे. पंतप्रधान मोदींपासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या घोषणांवरुन विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जोरदार टीका केली होती. योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र अजित पवार आणि काही भाजप नेत्यांनीही याला विरोध केला होता. आता निकालानंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी या घोषणेचा आपल्याला फटका बसला असल्याचे म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ८६ पैकी केवळ १० जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय मिळवता आला. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आम्हाला अपेक्षित होता असा निर्णय लागला नसल्याचे म्हटलं आहे. तसेच यावेळी बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरूनही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

कराडमधल्या पत्रकार परिषदेरम्यान, शरद पवार यांना पत्रकारांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा फटका महाविकास आघाडीला बसला का? असा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी बटेंगे तो कटेंगेचा फटका बसला असल्याची कबुली दिली आहे. "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिला. मात्र, त्या घोषणेमुळे निवडणुकीत मतांचं ध्रृवीकरणं नक्कीच झालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन ज्याप्रकारे प्रचार करत होते, त्यामुळे निश्चितच फरक पडला”, असं शरद पवार यांनी म्हटलं.

"ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन बोलताना शरद पवार यांनी माहितीशिवाय बोलणार नसल्याचे म्हटलं आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र, याबाबत जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.

आम्हाला असा अनुभव कधीच आला नाही - शरद पवार

"आमची जशी अपेक्षा होती तसा हा निकाल नाही. मात्र, शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. सध्या माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही. त्यामुळे निकालाबाबत काही भाष्य करणं योग्य नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक वर्ष आम्ही सामाजिक जीवनात आहोत. पण असा अनुभव आम्हाला कधी आला नव्हता. आता असा अनुभव आला आहे तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ