शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 19:30 IST

शरद पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचे सांगितले.

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही यंदा विविध घोषणांमुळे चर्चेची ठरली आहे. पंतप्रधान मोदींपासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या घोषणांवरुन विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जोरदार टीका केली होती. योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र अजित पवार आणि काही भाजप नेत्यांनीही याला विरोध केला होता. आता निकालानंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी या घोषणेचा आपल्याला फटका बसला असल्याचे म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ८६ पैकी केवळ १० जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय मिळवता आला. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आम्हाला अपेक्षित होता असा निर्णय लागला नसल्याचे म्हटलं आहे. तसेच यावेळी बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरूनही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

कराडमधल्या पत्रकार परिषदेरम्यान, शरद पवार यांना पत्रकारांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा फटका महाविकास आघाडीला बसला का? असा प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी बटेंगे तो कटेंगेचा फटका बसला असल्याची कबुली दिली आहे. "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिला. मात्र, त्या घोषणेमुळे निवडणुकीत मतांचं ध्रृवीकरणं नक्कीच झालं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन ज्याप्रकारे प्रचार करत होते, त्यामुळे निश्चितच फरक पडला”, असं शरद पवार यांनी म्हटलं.

"ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन बोलताना शरद पवार यांनी माहितीशिवाय बोलणार नसल्याचे म्हटलं आहे. आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र, याबाबत जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही”, असं शरद पवार म्हणाले.

आम्हाला असा अनुभव कधीच आला नाही - शरद पवार

"आमची जशी अपेक्षा होती तसा हा निकाल नाही. मात्र, शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. सध्या माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही. त्यामुळे निकालाबाबत काही भाष्य करणं योग्य नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक वर्ष आम्ही सामाजिक जीवनात आहोत. पण असा अनुभव आम्हाला कधी आला नव्हता. आता असा अनुभव आला आहे तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन काम करणं गरजेचं आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ