शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"वडिलांची तब्येत खराब असली तर पहिला फोन राज ठाकरेंचा येतो"; सुप्रिया सुळेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 19:06 IST

राज ठाकरेंचे शरद पवारांबाबत असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांबाबत सुप्रिया सुळेंनी खुलासा केला आहे.

Supriya Sule : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर जोरदार टीका आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही यामध्ये मागे नाही. मनसेने यावेळी विधानसभा निवडणूक स्वबाळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्रभर सभा घेत आहे. या सभांमधून राज ठाकरे महायुती, महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. विशेषतः शरद पवार यांच्यावर उघडपणे अनेकदा टीका केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीचं विष कालवल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. मात्र आता राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे.

आठवड्याभरापूर्वी जातीवाद पसरवत शरद पवार यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्याआधीही विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. राज्यात फोडाफोडीचे राजकारण झाले. या सर्व गोष्टींना शरद पवार कारणीभूत आहेत. त्यांनी ही सुरुवात केली. जातीचे विषही शरद पवार यांनीच कालवले, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. मात्र या पलीकडेही राज ठाकरे यांच्या कुटुंबांसोबत पवार कुटुंबियांसोबत असलेल्या नात्याबाबत सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे.

झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी माहीम मध्ये उद्धव ठाकरेंनी उमेदवार द्यायला हवा होता का या प्रश्नाला उत्तर देताना प्रतिक्रिया दिली. "यामध्ये माझा संबंध नाही. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आमच्यासोबत फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माझं लग्न ठरवण्यात सगळ्यात मोठा पुढाकार बाळासाहेब आणि मीनाताईंनी घेतला होता. हे मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या सासर्‍यांची आणि बाळासाहेबांची फार जवळची मैत्री होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी कौटुंबिक संबंध आजही पाळले आहेत. राज ठाकरेंच्या घरात लग्न होतं तेव्हा आम्ही आवर्जून गेलो होतो. माझ्या वडिलांची तब्येत खराब असल्याची बातमी आली तर पहिला फोन राज ठाकरेंचा येतो. हे मी आयुष्यभर विसरणार नाही. राजकारण चालत राहील. पण वैयक्तिक संबंध सगळ्याच ठाकरे कुटुंबीयांनी जपले आहेत," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

"मला बाळासाहेब खूप प्रिय होते मी आणि सदानंद आम्ही दोघेही बाळासाहेबांना भेटायला जायचो. तू नात्यातला ओलावा त्या पिढीने जपला आणि तो पुढेही न्यायचा प्रयत्न आमच्या पिढीत दोन्ही बाजू कडून होत आहेत," असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेRaj Thackerayराज ठाकरे