शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

कलम 370, राम मंदिरावर उद्धव बोलले पण 'आरे'चं विसरले!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 11:02 AM

विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आरेतील वृक्षतोड प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं आरेतील वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर, लगेचच संध्याकाळी आरेतील झाडं तोडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आरेचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला होता. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात सुनावणी करत तोडकामावर बंदी घातली. मात्र अजूनही हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. तर 'आरे'ला 'का रे' करण्याची डरकाळी फोडणारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसऱ्या मेळावाच्या भाषणात 'आरे'चा साधा उल्लेख सुद्धा केला नाही.

विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आरेतील वृक्षतोड प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. तर वृक्षतोड करण्यास प्रचंड विरोध होत असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने सुद्धा विरोध केला होता. तर ‘जे नाणारचं झालं तेच आरेचं होणार’ असा इशारा देत, मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड कोणत्याही परिस्थितीत शिवसेना होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच यावेळी त्यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जाहीरपणे विरोध सुद्धा केला होता.

मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली होती. तर 2 हजार 141 झाडे तोडण्यात आली होती. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात सुनावणी करत तोडकामावर बंदी घातली आहे. मात्र पुढे उद्धव ठाकरे यांची भूमिका सुद्धा युती झाल्याने बदलली असल्याचे पहायला मिळाली.

युती होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आरेतील वृक्षतोडीला उघडपणे विरोध केला होता. त्यामुळे दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव ठाकरे हे या मुद्द्यावर बोलतील अशी अपेक्षा असताना, त्यांनी कलम 370 व राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलणे पसंद केले. तर युती झाल्याने भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी होऊ नयेत म्हणून, शिवसेना आरेतील वृक्षतोडीविरोधात एक पाऊल मागे गेली असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.