शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Maharashtra Election 2019: मतदानावर पावसाचे सावट; प्रशासनाच्या चितेंत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 16:09 IST

सोमवारी मतदान असून मतदानावर देखील पावसाचे सावट आहे.

मुंबई : गेल्या दोन आठवड्यापासून गायब असलेला पाऊस पुन्हा एकदा परतला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी आणि सोमवारी काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पावसाने हजेरी लावल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. त्याचवेळी राज्यभरात पावसांने जोर धरला आहे. सोमवारी मतदान असून मतदानावर देखील पावसाचे सावट आहे. त्यामुळे मतांच्या टक्केवारीत घट येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून अधिक व्यापक प्रयत्न केले जात असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

शनिवारी झालेल्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रे पाण्यात बुडाली होती. तसेच  काही मतदान केंद्रांना गळती लागली होती. तर बनोटी मंडळातील मतदान केंद्र असलेल्या शाळांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने मतदान केंद्रे पुराच्या पाण्यात बुडाली होती. मात्र पाणी ओसरताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने शाळेतील शिक्षक व निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या परिसरात मुरूम टाकून दुरूस्ती केली आहे.

सोमवारी होणाऱ्या मतदानावेळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होऊ नयेत म्हणून, यावर आधीच उपाययोजना करण्याचे प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहे. काही ठिकाणी प्रशासनाकडून वॉटरप्रुफ मंडपांच्या निर्मितीची तयारी करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मतदानावर असलेल्या पावसाच्या सावटाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.