शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

फडणवीस-उद्धव यांच्या सर्वाधिक सभा,तर पवारांनी गाजवले मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 13:24 IST

गेली चार आठवडे महराष्ट्रात प्रचाराची धामधूम अनुभवायला मिळाली

मुंबई : आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी शनिवारी दुपारी ३ वाजता शांत झाली. त्यामुळे आता कुणालाच जाहीर सभा घेता येणार नाही. तर गेली चार आठवडे महराष्ट्रात प्रचाराची धामधूम अनुभवायला मिळाली. युती आणि महाआघडीच्या नेत्यांनी मैदान गाजवलं तर मनसे प्रमुख राज ठाकरेंसुद्धा प्रचाराच्या आखाड्यात उतरले असल्याचे पाहायला मिळाले.

गेल्या २८ दिवसांच्या काळात सर्वच राजकीय पक्षातील महत्वाच्या नेत्यांच्या राज्यभर सभा पार पडल्या. भाजपच्या वतीने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर सभा घेतल्या, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य ठाकरे हे सुद्धा प्रचाराच्या आखाड्यात उतरले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर व मनसेचे राज ठाकरे यांनी सुद्धा विविध मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर सभा घेतल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकूण ९ सभा घेतल्या, तर अमित शहा यांनी २१ सभा आणि १ ठिकाणी रोड शो केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ४८ सभा, ३ रोड शो व १ माँर्निंग वॉक केला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ४८ सभा विविध मतदारसंघात घेतल्याचे पाहायला मिळाले. तर शेवटच्या टप्यात साताऱ्यातील चर्चेची ठरलेली सभा मिळवून शरद पवारांनी एकूण ४३ सभा घेतल्या.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकूण ४६ सभा घेतल्या. तर एमआयचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी २५ ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. त्याचप्रमाणे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २० सभा घेतल्या. तर प्रचाराची धामधूम जरी संपली असली तरीही उमेदवारांची धाकधूक कायम आहे.