शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 16:47 IST

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे नाराज असून, ते गोर्डे यांच्या प्रचारापासून लांब असल्याचे दिसत आहे.

मुंबई - राजकरणात कधी काय होईल यांचा अंदाज नसतो. असेच काही पैठण विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. कधीकाळी कट्टर शिवसैनिक असलेले आणि त्यांनतर भाजपमध्ये गेलेले दत्ता गोर्डे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवत, राजकीय गुरूलाच आव्हान देत मैदानात उतरले आहे. त्यामुळे पैठण मतदारसंघातील लढत चर्चेचा विषय ठरत आहे.

गेल्यावेळी आमदार भुमरे पैठणमधून चौथ्यांदा ( २००९ सोडून ) आमदार म्हणून निवडून आले. मात्र भुमरेंच्या राजकीय तालमीतील मल्ल समजले जाणारे दत्ता गोर्डेचं आता त्यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहे. गोर्डे हे भाजपमध्ये असताना सुद्धा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडली नव्हती. तर भुमरेंच्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारचं अशी भूमिका गोर्डे यांनी यावेळी घेतली होती.त्यामुळे ऐनवेळी गोर्डे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवत, भूमरेंच्या विरोधात दंड थोपटले. तर या दोन्ही नेत्यांनी मतदारसंघात सभा व बैठकीचा धडाकाच लावला असून, संदीपान भुमरे व दत्ता गोर्डे यांच्यातचं खरी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुरु-शिष्याच्या लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संजय वाघचौरे नाराज असून, ते गोर्डे यांच्या प्रचारापासून लांब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर शिवसेनेचे भुमरेंसाठी भाजपचे नेते प्रचारात उतरले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे काँग्रेसचे नेते सुद्धा गोर्डेंचा प्रचार करतांना दिसत आहे. त्यामुळे पैठणमध्ये शिवसेना पुन्हा गड राखणार की परिवर्तन होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जातीय समीकरणे ठरणार महत्वाचे

वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण रिंगणात असून, दलित समाजातील मतदार बरोबरच बंजारा समाजातील मते त्यांच्या बाजूने पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सहाजिकच याचा फटका भुमरे यांना बसू शकतो. तर राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहणारा मुस्लीम समाज एमआयएमसोबत जाण्याची शक्यता असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी पैठण विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत जातीय समीकरणे महत्वाचे ठरणार असल्याचे पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.