शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; मराठवाड्यात अनेक ठिकाणी राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 20:39 IST

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात याला गालबोट लागले

मुंबई : राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडले. सामान्य नागरिकांसह, राजकरणी आणि सेलेब्रिटींही आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यात याला गालबोट लागले. औरंगाबादमध्ये एमआयएम-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हाणामारीची घटना तर जालना जिल्ह्यातील दोन गटातील राडा पाहायला मिळाला. त्याचबरोबर पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी गोंधळ घातल्याने आज मराठवाडा विविध राड्याने गाजला.

सकाळपासून मतदानाला शांतेत सुरवात झाली असतनाच, पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी गोंधळ घातल्याचे समोर आले. तर शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील कर्मचारीयांच्याकडून बोगस मतदान करण्यात येत असल्याचे त्यांनी आरोप केला.

ही घटना ताजी असतानाचं जालन्यातील अंबडच्या जामखेडमध्ये दोन गटात धक्काबुक्की झाली. भाजपचे सरपंच आणि राष्ट्रवादीच्या उपसरपंचाच्या गटात ही मारहाण झाली असल्याचे पाहायला मिळाले. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर सुद्धा व्हायरल झाला आहे.

तर मतदानाच्या शेवटच्या टप्यात औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे मध्य चे उमेदवार कदीर मौलाना यांच्यामध्ये कटकटी गेट येथे बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगवले. यामध्ये खासदार इम्तियाज जलील यांचे कपडे सुद्धा फाटले. त्यामुळे या तिन्ही घटनांमुळे मराठवाड्यातील मतदान प्रकियेला गालबोट लागले.