शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

Maharashtra Election 2019: 'कर्जमाफीचं विचारताच, मुख्यमंत्र्यांकडून 'भारत माता की जय'च्या घोषणा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:02 IST

कलम ३७० हटवले चांगले केलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याबद्दल कोणत्या पक्षाने काय केलं

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात आला असून, राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस यांच्या सभेत शेतकरी कर्जमाफी बद्दल विचारत असताना, मुख्यमंत्री मात्र भारत माता की जय, अशा घोषणा देत असल्याच्या आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. मूर्तिजापूर येथील सभेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच मतदारसंघात राजकीय नेत्यांच्या सभा होताना पहायला मिळत आहे. तर याच सभामधून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी गुरुवारी मूर्तिजापूर येथील सभेत बोलताना भाजप सरकारवर टीका करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत एका शेतकऱ्याने उभा राहून कर्जमाफी झाली नाही म्हणून प्रश्न विचारला. मात्र मुख्यमंत्री त्याचे आयकत नव्हते, तर फक्त 'भारत माता की जय - भारत माता की जय' अशा घोषणा देत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. भारत माता तुमची मात्र मलिदा यांचा असा खोचक टोला सुद्धा यावेळी बच्चू कडूंनी फडणवीस यांना लगावला.

कलम ३७० हटवले चांगले केलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याबद्दल कोणत्या पक्षाने काय केलं असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर राज्यातील निवडणुका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाल्या पाहिजेत. मात्र तसे होत नसून, निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्दा पुढे केला जात असल्याचे बच्चू कडू म्हणाले.