शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: 'कर्जमाफीचं विचारताच, मुख्यमंत्र्यांकडून 'भारत माता की जय'च्या घोषणा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:02 IST

कलम ३७० हटवले चांगले केलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याबद्दल कोणत्या पक्षाने काय केलं

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात आला असून, राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस यांच्या सभेत शेतकरी कर्जमाफी बद्दल विचारत असताना, मुख्यमंत्री मात्र भारत माता की जय, अशा घोषणा देत असल्याच्या आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. मूर्तिजापूर येथील सभेत ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच मतदारसंघात राजकीय नेत्यांच्या सभा होताना पहायला मिळत आहे. तर याच सभामधून सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू यांनी गुरुवारी मूर्तिजापूर येथील सभेत बोलताना भाजप सरकारवर टीका करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा समाचार घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत एका शेतकऱ्याने उभा राहून कर्जमाफी झाली नाही म्हणून प्रश्न विचारला. मात्र मुख्यमंत्री त्याचे आयकत नव्हते, तर फक्त 'भारत माता की जय - भारत माता की जय' अशा घोषणा देत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. भारत माता तुमची मात्र मलिदा यांचा असा खोचक टोला सुद्धा यावेळी बच्चू कडूंनी फडणवीस यांना लगावला.

कलम ३७० हटवले चांगले केलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. त्याबद्दल कोणत्या पक्षाने काय केलं असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर राज्यातील निवडणुका शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाल्या पाहिजेत. मात्र तसे होत नसून, निवडणुकीत कलम ३७० च्या मुद्दा पुढे केला जात असल्याचे बच्चू कडू म्हणाले.