शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

महाराष्ट्रात दररोज ५ हजारवेळा वीज चमकली; चार महिन्यांतील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 06:45 IST

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांत वीज कोसळण्याच्या घटनांत एक हजार पटीने वाढ झाली आहे

सचिन लुंगसे 

मुंबई : महाराष्ट्रात एप्रिल ते जुलै, २०१९ या चार महिन्यांमध्ये सहा लाखांहून अधिक वेळा विजांचा कडकडाट झाल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे दररोज सरासरी पाच हजार वेळा वीज चमकली आहे. वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळता याव्यात म्हणून, हवामान खात्याने वीज चमकणे आणि ती कोसळण्यापूर्वी माहिती देणारी यंत्रणा नुकतीच कार्यान्वित केली आहे. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.

क्लायमेट रेजिलिएंट ऑब्झर्विंग सीस्टम प्रमोशन काउंसिलच्या म्हणण्यानुसार, हवामान खात्याकडून विजेची माहिती देणाºया सेंसर व्यतिरिक्त उपग्रह आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंटसारख्या संस्थांकडून प्राप्त आकडेवारीच्या विश्लेषणानंतर हा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, ओरिसामध्ये नऊ लाखांहून अधिक वेळा वीज कोसळली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रत्येकी सहा लाखांहून अधिक वेळा वीज चमकली. मध्य प्रदेशात ४ लाख ८१ हजार ७२१ वेळा वीज चमकली. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजे २० हजारांच्या जवळपास वीज चमकली. हवामान खात्याने याच वर्षी वीज चमकणे आणि ती कोसळण्यापूर्वी माहिती देणारे ‘दामिनी’ नावाचे अ‍ॅप कार्यान्वित केले. ‘नाउ-कास्ट वॉर्निंग’ या नावानेही ते ओळखले जात आहे. चमकणाºया, कोसळणाºया विजेबाबत माहिती देण्यासह मनुष्यहानी होऊ नये, म्हणून ही सीस्टिम हवामान खात्याने कार्यान्वित केली. वीज कोसळण्याची माहिती आगाऊ मिळाली, तर नक्कीच जीवितहानी रोखता येईल, हा यामागचा हेतू आहे.

तीन वर्षांत घटनांमध्ये वाढवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांत वीज कोसळण्याच्या घटनांत एक हजार पटीने वाढ झाली आहे. कडाक्याचा उन्हाळा आणि विलंबाने दाखल होणाºया मान्सूनमुळे वीज कोसळण्याच्या घटनांत वाढ होत आहे. सुका दुष्काळ आणि त्यानंतर पडणारा ओला दुष्काळ यास कारणीभूत आहे.

दरवर्षी दोन हजार जणांचा वीज कोसळून मृत्यूदेशभरात प्रत्येक वर्षी सरासरी २ हजार ते २ हजार ५०० नागरिकांचा वीज कोसळल्याच्या दुर्घटनेत मृत्यू होतो. २०१८ साली हा आकडा वाढला. वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ हजार नागरिकांना जिवास मुकावे लागले. देशभरात एप्रिल, २०१९ पासून जुलै, २०१९ पर्यंत म्हणजे चार महिन्यांत ६५.५५ लाख वेळा वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांत १ हजार ३११ जणांचा मृत्यू झाला असून, यापेक्षा दुप्पट लोक जखमी झाले आहेत. चार महिन्यांत देशभरात २३.५३ लाख (३६ टक्के) अशा घटना क्लाउड टू ग्राउंडच्या लायटनिंगच्या आहेत. म्हणजे वीज कडाडतानाच ती जमिनीवर कोसळली आहे. यामुळे वृक्ष, प्राणी, मनुष्याचे अधिकाधिक नुकसान होते. अहवालातील मृतांचा आकडा हा राज्य सरकारासह माध्यमांच्या वृत्त संकलनानंतर जारी करण्यात आला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस