शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात दररोज ५ हजारवेळा वीज चमकली; चार महिन्यांतील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 06:45 IST

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांत वीज कोसळण्याच्या घटनांत एक हजार पटीने वाढ झाली आहे

सचिन लुंगसे 

मुंबई : महाराष्ट्रात एप्रिल ते जुलै, २०१९ या चार महिन्यांमध्ये सहा लाखांहून अधिक वेळा विजांचा कडकडाट झाल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे दररोज सरासरी पाच हजार वेळा वीज चमकली आहे. वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळता याव्यात म्हणून, हवामान खात्याने वीज चमकणे आणि ती कोसळण्यापूर्वी माहिती देणारी यंत्रणा नुकतीच कार्यान्वित केली आहे. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.

क्लायमेट रेजिलिएंट ऑब्झर्विंग सीस्टम प्रमोशन काउंसिलच्या म्हणण्यानुसार, हवामान खात्याकडून विजेची माहिती देणाºया सेंसर व्यतिरिक्त उपग्रह आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंटसारख्या संस्थांकडून प्राप्त आकडेवारीच्या विश्लेषणानंतर हा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, ओरिसामध्ये नऊ लाखांहून अधिक वेळा वीज कोसळली. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रत्येकी सहा लाखांहून अधिक वेळा वीज चमकली. मध्य प्रदेशात ४ लाख ८१ हजार ७२१ वेळा वीज चमकली. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजे २० हजारांच्या जवळपास वीज चमकली. हवामान खात्याने याच वर्षी वीज चमकणे आणि ती कोसळण्यापूर्वी माहिती देणारे ‘दामिनी’ नावाचे अ‍ॅप कार्यान्वित केले. ‘नाउ-कास्ट वॉर्निंग’ या नावानेही ते ओळखले जात आहे. चमकणाºया, कोसळणाºया विजेबाबत माहिती देण्यासह मनुष्यहानी होऊ नये, म्हणून ही सीस्टिम हवामान खात्याने कार्यान्वित केली. वीज कोसळण्याची माहिती आगाऊ मिळाली, तर नक्कीच जीवितहानी रोखता येईल, हा यामागचा हेतू आहे.

तीन वर्षांत घटनांमध्ये वाढवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांत वीज कोसळण्याच्या घटनांत एक हजार पटीने वाढ झाली आहे. कडाक्याचा उन्हाळा आणि विलंबाने दाखल होणाºया मान्सूनमुळे वीज कोसळण्याच्या घटनांत वाढ होत आहे. सुका दुष्काळ आणि त्यानंतर पडणारा ओला दुष्काळ यास कारणीभूत आहे.

दरवर्षी दोन हजार जणांचा वीज कोसळून मृत्यूदेशभरात प्रत्येक वर्षी सरासरी २ हजार ते २ हजार ५०० नागरिकांचा वीज कोसळल्याच्या दुर्घटनेत मृत्यू होतो. २०१८ साली हा आकडा वाढला. वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ हजार नागरिकांना जिवास मुकावे लागले. देशभरात एप्रिल, २०१९ पासून जुलै, २०१९ पर्यंत म्हणजे चार महिन्यांत ६५.५५ लाख वेळा वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांत १ हजार ३११ जणांचा मृत्यू झाला असून, यापेक्षा दुप्पट लोक जखमी झाले आहेत. चार महिन्यांत देशभरात २३.५३ लाख (३६ टक्के) अशा घटना क्लाउड टू ग्राउंडच्या लायटनिंगच्या आहेत. म्हणजे वीज कडाडतानाच ती जमिनीवर कोसळली आहे. यामुळे वृक्ष, प्राणी, मनुष्याचे अधिकाधिक नुकसान होते. अहवालातील मृतांचा आकडा हा राज्य सरकारासह माध्यमांच्या वृत्त संकलनानंतर जारी करण्यात आला आहे. 

टॅग्स :Rainपाऊस