शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

राजापुरातील ‘रिफायनरी’ प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, तहसिलदार कार्यालयावर काढला महामोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 14:33 IST

रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत.  या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी या 14 गावातील ग्रामस्थांनी शनिवारी तहसिलदार व प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

जैतापूर, दि. 9 - रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत.  या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी या 14 गावातील ग्रामस्थांनी शनिवारी तहसिलदार व प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या महामोर्चामध्ये शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. या मोर्चेक-यांनी यावेळी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवाय, त्यांनी आपल्या व्यथा तहसिदार आणि प्रांत कार्यालयाकडे निवेदनाद्वारे दाखल केल्या आहेत.  कोणत्याही  परिस्थितीत हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान, अणुऊर्जा प्रकल्पापाठोपाठ रिफायनरी प्रकल्पातील संघर्ष आणखीनच तीव्र होणार असल्याचं दिसते आहे. 

काय आहे नेमका प्रकल्प?केंद्र शासनाच्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल अशी 51 टक्के, तर राज्य सरकारची 49 टक्के भागीदारी असलेला जगातील सर्वात मोठा दोन लाख कोटींचा रिफायनरी प्रकल्प तालुक्यातील नाणार -सागवे परिसरात येऊ घातला आहे. एकूण या प्रकल्पाला  15 हजार एकर जमीन आवश्यक असून काही एकर जागेवर तो उभा राहणार आहे. हा प्रकल्पही अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणेच प्रदूषणकारी असल्याचे आरोप स्थानिक जनतेतून होत असून आमच्या बागायती, भातशेती व निसर्ग यांचे रक्षण व्हावे या हेतूने येथील जनता प्रकल्पाविरुद्ध उभी ठाकली आहे.   दरम्यान, हा प्रकल्पच रद्द झालाच पाहिजे, यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (9 सप्टेंबर ) तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.