शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

राजापुरातील ‘रिफायनरी’ प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, तहसिलदार कार्यालयावर काढला महामोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 14:33 IST

रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत.  या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी या 14 गावातील ग्रामस्थांनी शनिवारी तहसिलदार व प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

जैतापूर, दि. 9 - रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत.  या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी या 14 गावातील ग्रामस्थांनी शनिवारी तहसिलदार व प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या महामोर्चामध्ये शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. या मोर्चेक-यांनी यावेळी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवाय, त्यांनी आपल्या व्यथा तहसिदार आणि प्रांत कार्यालयाकडे निवेदनाद्वारे दाखल केल्या आहेत.  कोणत्याही  परिस्थितीत हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान, अणुऊर्जा प्रकल्पापाठोपाठ रिफायनरी प्रकल्पातील संघर्ष आणखीनच तीव्र होणार असल्याचं दिसते आहे. 

काय आहे नेमका प्रकल्प?केंद्र शासनाच्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल अशी 51 टक्के, तर राज्य सरकारची 49 टक्के भागीदारी असलेला जगातील सर्वात मोठा दोन लाख कोटींचा रिफायनरी प्रकल्प तालुक्यातील नाणार -सागवे परिसरात येऊ घातला आहे. एकूण या प्रकल्पाला  15 हजार एकर जमीन आवश्यक असून काही एकर जागेवर तो उभा राहणार आहे. हा प्रकल्पही अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणेच प्रदूषणकारी असल्याचे आरोप स्थानिक जनतेतून होत असून आमच्या बागायती, भातशेती व निसर्ग यांचे रक्षण व्हावे या हेतूने येथील जनता प्रकल्पाविरुद्ध उभी ठाकली आहे.   दरम्यान, हा प्रकल्पच रद्द झालाच पाहिजे, यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (9 सप्टेंबर ) तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.