शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

महाआघाडी सरकार शेतकऱ्यांना दोन टप्प्यात देणार कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 05:33 IST

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले.

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यात कर्जमाफी देण्याची योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आखली आहे. त्यासाठी पहिला टप्पा आर्थिक वर्ष संपण्याच्या आत तर दुसरा टप्पा १ एप्रिल २०२० नंतर पूर्ण केला जाईल. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे विश्वसनीय सुत्रांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नागपुरात येताच जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, नवाब मालिक, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांच्यासमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत शेतकºयांच्या कर्जमाफीचा विषय निघाला. त्यावर सविस्तर चर्चा झाली. तत्पूर्वी अजित पवार यांनी वित्त विभागाच्या अधिकाºयांकडून राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेतली. कर्जमाफीसाठी किती पैसे लागतील, याचा अंदाज घेण्यात आला. तसेच विविध बँकांकडून शेतकºयांकडील कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून कर्जाची आकडेवारी मागवली होती. सुरुवातीला ही आकडेवारी ८९ हजार कोटींची होती. नंतर विविध नियम आणि अटी टाकण्यात आल्या. तेव्हा बँकांनी स्वत:हून किमान १६ लाख खाते रद्द केले. कर्जमाफीचा आकडा साठ हजार कोटीवर आला. त्यापैकी काही कर्ज फडणवीस सरकारने माफ केले होते. या अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होणार नाही. मात्र अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर जानेवारी महिन्यात कर्जमाफीची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले. राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असली तरी कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी द्यायची आणि शेतकºयांना चिंतामुक्त करायचे, अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी