शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

व-हाडातील धरणात अत्यल्प जलसाठा

By admin | Updated: February 11, 2015 23:59 IST

दुष्काळाचे सावट; पश्‍चिम व-हाडातील ९३ हजार हेक्टरवरील फळबागा धोक्यात !

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : अत्यल्प जलसाठय़ामुळे पश्‍चिम वर्‍हाडातील सरासरी ९३ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा धोक्यात आल्या आहेत. मान्सुनने दगा दिल्यामुळे खरीप हंगामात शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणावर झळ सोसावी लागली. त्यानंतर रब्बी हंगामालाही अत्यल्प पावसाचा फटका बसला आहे. अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील ओलिताची सोय असलेल्या शेतकर्‍यांनी सरासरी ९३ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावर फळबाग फुलविली आहे. परंतु, विभागातील बहुतांश धरणांमध्ये सरासरी ४0 टक्क्याच्या आतच जलसाठा उरला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकाळी तालुक्यातील काटेपुर्णा धरणात २८ टक्के जलसाठा असून, दगडपारवा धरणातील जलपातळी शुन्यावर पोहचली आहे. पातुर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ४0 टक्के, मुर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम धरणात १७ टक्केच जलसाठा आहे. निगरुणा व तेल्हारा तालुक्यातील वाण धरणातील पाणी पातळीही खालावत चालली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नळगंगा धरणात ४५ टक्के, खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात ६0 टक्के व इतर धरणांमधील पाणी पातळीही खालावली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ४५ टक्केच जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातील पूस प्रकल्प, महागाव तालुक्यातील लोअस पूस या मध्यम धरणातही जलसाठा खालावत चालला आहे. तर केळापूर परिसरातील सायखेडा मध्यम प्रकल्पाची पातळी ४७ टक्के व नेर तालुक्यातील गोकी मध्यम प्रकल्पाची पातळी ५0 टक्क्यावर पोहचली आहे. घाटंजी तालुक्यातील वाघाडी मध्यम प्रकल्प, बोरगाव मध्यम धरणांसह अमरावती जिल्ह्यातील जलसाठाही खालावत चालला आहे. अमरावती विभागातील बहुतांश धरणातील जलसाठे ४0 टक्केच्या खाली आल्याने फळबांगावर पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. *फळबागा धोक्यातशेतकर्‍यांचा आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा कल वाढला असल्याने फळबाग लागवडीच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात २0 हजार १८१ हेक्टर, अकोला जिल्ह्यात १७ हजार ६0४ हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३ हजार ५८४ हेक्टर, अमरावती जिल्ह्यात ३२ हजार ३५ हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात १९ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे.