शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४ लाख शेतकऱ्यांचा अल्पदरातील गहू साडेपाच महिन्यांपासून बंद, १४ जिल्ह्यांमध्ये फटका

By यदू जोशी | Updated: October 21, 2022 14:07 IST

राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील ४ लाख शेतकऱ्यांना अल्पदरात गहू देण्याची योजना साडेपाच महिन्यांपासून बंद पडली आहे. केवळ एक किलो तांदूळ तेवढा दिला जात आहे.

यदु जोशी 

मुंबई : राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील ४ लाख शेतकऱ्यांना अल्पदरात गहू देण्याची योजना साडेपाच महिन्यांपासून बंद पडली आहे. केवळ एक किलो तांदूळ तेवढा दिला जात आहे. या शेतकऱ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचाही लाभ मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेवरील आणि केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ देण्याची योजना आणली होती. एकूण पाच किलो धान्य दिले जायचे. काही जिल्ह्यांमध्ये ते प्रमाण तीन-दोन वा चार-एक असे होते. बहुतेक ठिकाणी चार किलो गहू दिले जात होते. महाविकास आघाडी सरकारमध्येही योजना कायम होती. त्यासाठीच्या धान्याची खरेदी ही राष्ट्रीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) केली जात होती.  मात्र, महाविकास आघाडी सरकार जाण्याच्या काहीच दिवस आधी एफसीआयकडून धान्य खरेदी न करता ती खासगी पुरवठादाराकडून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एफसीआयने गहू पुरवठ्याबाबत असमर्थता दर्शविल्याने हा निर्णय घ्यावा लागला होता. एफसीआयचा पुरवठा बंद झाल्यानंतर आता पाच महिन्यांपासून केवळ एक वा काही ठिकाणी दोन किलो तांदूळ तेवढा पुरवला जात आहे. 

खरेदीही रेंगाळली

गेल्या काही महिन्यांतील अतिवृष्टी आणि त्यातून झालेल्या पीकहानीमुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे भीषण वास्तव समोर आलेले असताना दुसरीकडे सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे. खासगी पुरवठादाराकडून गहू खरेदी करून पुरवठा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या प्रक्रियेला गती न दिल्याने खरेदी रेंगाळली असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनिमित्त चार खाद्यवस्तू १०० रुपयांत देण्याची योजना शिंदे सरकारने जाहीर केली आहे. आता बहुतेक जिल्ह्यांमधील गोदामांमध्ये या वस्तू पोहोचल्या असून वाटपही सुरू झाले आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या खाद्यवस्तू एका पिशवीत देण्यात येणार असून, त्यावर आनंदाचा शिधा असे लिहिले आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत.

योजनेचे जिल्हावार लाभार्थी

औरंगाबाद ३५८०९१, जालना १४३०१२, नांदेड ३८४८६२, बीड ५५३५२६, उस्मानाबाद २५०८८१, परभणी २५३७८४, लातूर २९९९३६, हिंगोली १६१५२५, अमरावती ५०३४९९, वाशिम ९९७१३, अकोला १९२५५४, बुलडाणा ३७२०२३, यवतमाळ ३५८९९६, वर्धा ५६७८१.

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे