शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

४ लाख शेतकऱ्यांचा अल्पदरातील गहू साडेपाच महिन्यांपासून बंद, १४ जिल्ह्यांमध्ये फटका

By यदू जोशी | Updated: October 21, 2022 14:07 IST

राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील ४ लाख शेतकऱ्यांना अल्पदरात गहू देण्याची योजना साडेपाच महिन्यांपासून बंद पडली आहे. केवळ एक किलो तांदूळ तेवढा दिला जात आहे.

यदु जोशी 

मुंबई : राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील ४ लाख शेतकऱ्यांना अल्पदरात गहू देण्याची योजना साडेपाच महिन्यांपासून बंद पडली आहे. केवळ एक किलो तांदूळ तेवढा दिला जात आहे. या शेतकऱ्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचाही लाभ मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेवरील आणि केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ देण्याची योजना आणली होती. एकूण पाच किलो धान्य दिले जायचे. काही जिल्ह्यांमध्ये ते प्रमाण तीन-दोन वा चार-एक असे होते. बहुतेक ठिकाणी चार किलो गहू दिले जात होते. महाविकास आघाडी सरकारमध्येही योजना कायम होती. त्यासाठीच्या धान्याची खरेदी ही राष्ट्रीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) केली जात होती.  मात्र, महाविकास आघाडी सरकार जाण्याच्या काहीच दिवस आधी एफसीआयकडून धान्य खरेदी न करता ती खासगी पुरवठादाराकडून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एफसीआयने गहू पुरवठ्याबाबत असमर्थता दर्शविल्याने हा निर्णय घ्यावा लागला होता. एफसीआयचा पुरवठा बंद झाल्यानंतर आता पाच महिन्यांपासून केवळ एक वा काही ठिकाणी दोन किलो तांदूळ तेवढा पुरवला जात आहे. 

खरेदीही रेंगाळली

गेल्या काही महिन्यांतील अतिवृष्टी आणि त्यातून झालेल्या पीकहानीमुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे भीषण वास्तव समोर आलेले असताना दुसरीकडे सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे. खासगी पुरवठादाराकडून गहू खरेदी करून पुरवठा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या प्रक्रियेला गती न दिल्याने खरेदी रेंगाळली असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनिमित्त चार खाद्यवस्तू १०० रुपयांत देण्याची योजना शिंदे सरकारने जाहीर केली आहे. आता बहुतेक जिल्ह्यांमधील गोदामांमध्ये या वस्तू पोहोचल्या असून वाटपही सुरू झाले आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या खाद्यवस्तू एका पिशवीत देण्यात येणार असून, त्यावर आनंदाचा शिधा असे लिहिले आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत.

योजनेचे जिल्हावार लाभार्थी

औरंगाबाद ३५८०९१, जालना १४३०१२, नांदेड ३८४८६२, बीड ५५३५२६, उस्मानाबाद २५०८८१, परभणी २५३७८४, लातूर २९९९३६, हिंगोली १६१५२५, अमरावती ५०३४९९, वाशिम ९९७१३, अकोला १९२५५४, बुलडाणा ३७२०२३, यवतमाळ ३५८९९६, वर्धा ५६७८१.

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे