शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कमी पटसंख्येच्या शाळांची झाली ‘आनंदी’ समूह शाळा; पहिला प्रयोग नंदुरबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 06:35 IST

आसपासच्या गावांतील अशा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा (क्लस्टर) सुरू करण्याची योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत आखली आहे. 

- मनोज मोघे

मुंबई : राज्यात १७ हजार ६०० शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी, एक किंवा दोन शिक्षक असल्याने या शाळांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. आसपासच्या गावांतील अशा शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा (क्लस्टर) सुरू करण्याची योजना समग्र शिक्षा अभियानांतर्गत आखली आहे. 

याचा पहिला प्रयोग पुण्यातील पानशेत आणि नंदुरबारमधील तोरणमलमध्ये शिक्षण विभागाकडून राबविण्यात आला आहे. यामुळे आसपासच्या १० ते १२ गावांतील शाळा एकाच ठिकाणी भरत आहेत.  

समूह शाळेतील सुविधासमूह शाळांत चांगल्या सुविधा आणि शिक्षक असल्याने विद्यार्थीही आनंदाने शिक्षण घेतात, असे शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी सांगितले. पानशेतमधील समूह शाळेत १० किमी परिसरातील विद्यार्थी येतात. असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे म्हणाले.

सर्वेक्षणातून अखेर गुरुजींची सुटका

-  राज्यातील १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याच्या अशैक्षणिक कामातून राज्यातील शिक्षकांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात होणारे नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे काम आता शिक्षकांऐवजी स्वयंसेवी संस्थांवर सोपविण्यात आले आहे. - अशैक्षणिक कामास जुंपल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट होती. त्यामुळे शिक्षण क्रांती संघटना तसेच इतर संघटनांनी शिक्षकांना या कामातून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर योजना शिक्षण संचालकांनी निर्णय घेतला आहे. योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

स्वयंसेवी संस्थांवर जबाबदारी सोपविणारनिरक्षर सर्वेक्षण मोहिमेत जनगणना २०११ नुसार गावनिहाय निरक्षरांची संख्या तब्बल १ कोटी ६३ लाख इतकी आहे. या निरक्षर व्यक्तींना मार्च २०२७ अखेरपर्यंत साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.  या सर्वेक्षणासाठी विविध घटकांनी स्वयंसेवी पद्धतीने ऑनलाइन नोंदणीद्वारे सहभाग घेणे अपेक्षित आहे.

अशी स्थिती

१७,६००शाळा या एक किंवा दोन शिक्षकी आहेत.२० पेक्षा कमी विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत. ७,०००शाळांत पाचपेक्षा कमी विद्यार्थी. ५,०००शाळांत १० पेक्षा कमी विद्यार्थी.  

काही शाळांत तर एक किंवा दोनच विद्यार्थी आहेत.

टॅग्स :Schoolशाळा