शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

भोंगे राज्याचाच विषय, सरकार हात झटकतेय; मनसे अल्टिमेटमवर ठाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:05 IST

राज्य सरकारने भोंग्यांविरोधात कोणतीही ठोस भूमिका न जाहीर केल्याने मनसेने ३ मे च्या अल्टिमेटमबाबत ठाम असल्याचे यावेळी जाहीर केले आहे. 

मुंबई :  राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी दिलेल्या ३ मे च्या अल्टिमेटमवर आम्ही ठाम आहोत, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. 

राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीकडे राज ठाकरे यांनी पाठ फिरविली. मात्र, मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भोंग्यांबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर मनसेने टीका केली. तसेच या बैठकीत राज्य सरकारने भोंग्यांविरोधात कोणतीही ठोस भूमिका न जाहीर केल्याने मनसेने ३ मे च्या अल्टिमेटमबाबत ठाम असल्याचे यावेळी जाहीर केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय जाहीर केला आहे. तो संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे भोंग्यांबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. त्यावर बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली. 

धार्मिक विषय नव्हे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व राज्यांना लागू होते, तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य सरकारला भोंग्यांबाबत आपली जबाबदारी झटकता येणार नाही. शिवाय, मशिदीवरील भोंग्यांचा त्रास सर्वांनाच होतो.  त्यामुळे हा एक धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. त्यामुळे भोंगे उतरविलेच पाहिजेत अशी मागणी नांदगावकर यांनी केली.

टॅग्स :MNSमनसे