शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!

By meghana.dhoke | Published: March 03, 2018 8:07 PM

31 जुलै 2015 रोजी भारत-बांग्लादेश सीमा करार अमलात आला. रक्ताचा एकही थेंब न सांडता दोन देशांनी शांतपणे आपल्या सीमा आखून घेतल्या.

साधीशी, सुती, धुवट साडी नेसलेल्या या बाई. पांचाली भट्टाचार्य त्यांचं नाव.निवृत्त शिक्षिका आहेत. त्रिपुराची राजधानी आगतरळ्यात राहतात. ही त्यांची एक ओळख. आता अजून एक ओळख सांगते..त्या आहेत मिसेस माणिक सरकार. 15 वर्षे त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेल्या माणिक सरकार यांच्या पत्नी. त्यांनी ना आपलं आडनाव बदललं, ना मिसेस सरकार म्हणून त्या कधी लाल दिव्याच्या गाडीतून मिरवल्या.त्यांची ही भेट. 29 जुलै 2015.31 जुलै 2015 रोजी भारत-बांग्लादेश सीमा करार अमलात आला. रक्ताचा एकही थेंब न सांडता दोन देशांनी शांतपणे आपल्या सीमा आखून घेतल्या. आंतरराष्ट्रीय सीमा बदलतात तेव्हा सीमेवर जगणाऱ्या माणसांचं काय होतं याचा अभ्यास करायचा म्हणून मी त्रिपुराला गेले होते. ( लोकमत दीपोत्सव 2015 मध्ये ‘तारकाटा बेडा’ हा लेखही प्रसिद्ध झाला.) आगरतळ्यात होतेच, तर दैनिक संबांद या वृत्तपत्राच्या कार्यालयात गेले. तिथं वृत्तसंपादक भौमिक भेटले. त्यादिवशी सकाळीच मुख्यमंत्र्यांनाही भेटून आले होते. सकाळी गेले, भेट मागितली. सहज भेट मिळाली. संध्याकाळी 7 ला या असं सचिवांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना भेटूनच दैनिक संबादच्या कार्यालयात गेले होते. बोलता बोलता विषय निघाला तर भौमिक म्हणाले, ‘बहुदीसे मिले?’ काही कळलं नाही, मग तेच म्हणाले, मिसेस सरकार? आता मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असं कुणालाही कसं भेटतील? तर ते म्हणाले, मै फोन लगाता...बोलणं झालं. त्या या म्हणाल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री निवासात त्यांना भेटायला गेले. सोबत भौमिक होतेच. गेल्या गेल्या बहुदींनी विचारलं, बेटे को साथ नहीं लाए?मी उडालेच. मी मुलाला घेऊन आगरतळ्याला आलेय, हे ह्यांना कसं कळलं. सहज विचारलं, आपको कैसे मालूम?त्या म्हणाल्या, कल रात सीएमसे बोला एक मुंबईसे जर्नलिस्ट आयी है, सुबह मिलने आ रही है. तो उन्होने बताया, बॉर्डर स्टडी करने आयी है, छोटा बच्चा है साथ में. कुछ खास बनाना.’मी स्तब्धच. तेवढ्यात इडली-सांबार-चटणी, बंगाली मिठाई आलीही. बहुदी म्हणाल्या, इधर का खाना अच्छा लगा नहीं होगा, तो मैनेही रात में सोचा आपके लिए इडली बनाए.’बहुदींनी स्वत: सकाळी उठून इडली केली. मुख्यमंत्री असलेल्या नवर्‍याला ऑफिसला जाताना डबा करुन दिला. मग त्या सगळं किचन आवरुन बसल्या होत्या. बरंच बोलणं झालं, बोलता बोलता सहज म्हणाल्याही, अभी पॉवर है बहौत साल से, तो कुछ लोग उसका गलत इस्तेमाल करते है. ये बुरा लगता है.तोवर मी ते साधंसं घर पाहत होते. एक बेडरुम. हॉल. किचन. बाकी सगळी पुस्तकं. हे दोघे पतीपत्नी घर म्हणून एवढय़ाच खोल्या वापरतात. मुलबाळ नाही, दोघंच राहतात. सगळंच साधं. मध्यमवर्गीय. म्हणजे त्या साधेपणाची जाणीवही होऊ नये इतकं साधं. बहुदी स्वत: मासे आणायला जातात, कधी लाल दिव्याची गाडी वापरत नाहीत, सिक्युरीटी नाही, रिक्षेतूनच प्रवास. फक्त प्रोटोकॉल असेल तेव्हा मुख्यमंत्र्यासोबत जातात. हे एरव्ही त्रिपुरात अनेकजण सांगतातच.त्यादिवशी घरी माहेरपणाला आलेल्या लेकीसारखं त्यांनी आगतस्वागत केलं. निघाले तर थेट रस्त्यार्पयत लांब सोडायला आल्या. पुढच्यावेळी लेकाला नक्की घेऊन ये म्हणाल्या.मात्र आम्ही निघतच होतो, तर बंगल्याच्या आवारातल्या बागेत माळी काम करत होता, बहुदीचं त्याच्याशी बंगालीतून बोलणं सुरु होतं. तळ्यात कमळं कशी फुलत नाही, हे तो माळी सांगत होता. त्यावर मी हसले तर त्या म्हणाल्या, बंगाली समझती हे?-थोडीसी. मी म्हटलं.तर त्या हसून म्हणाल्या, कितनी भी कोशीश करलो..इस मिट्टी में कमल नहीं खिलता.!***जुलै 2015 ची ही गोष्ट. दिल्लीत मोदी पंतप्रधान होऊन जेमतेम वर्ष झालं होतं. सुनील देवधरही नुकतेच त्रिपुरा भाजपचे प्रभारी झाले होते. दुसर्‍या दिवशी देवधर आणि आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले बिपलब देबही भेटलेच, तेव्हा तर त्रिपुरात कमळ फुलेल असं काही चित्रही नव्हतं. तीन वर्षात सुनील देवधर नावाच्या मराठी माळ्यानं तिथं कमळ फुलवून दाखवलं, त्रिपुरातल्या मातीचा कस बदलला, हवा पालटली.ती कशामुळे.?-त्याविषयी पुढच्या भागात